संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के

संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के वरोरा, दि. १६ एप्रिल: येथील संस्कार भारती पब्लिक स्कूलने यंदाच्या शैक्षणिक सत्रातील परीक्षेत तालुकास्तरावर आपला दबदबा कायम राखत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे. शाळेची ही कामगिरी उल्लेखनीय ठरली असून विद्यार्थिनी अदिती गायकवाड हिने तब्बल ९६.०० टक्के गुण प्राप्त करून वरोरा तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी एकूण ९० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी सर्वच्या सर्व ९० विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला असून शाळेचा निकाल १००% लागला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये तब्बल २५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य (डिस्टिंक्शन) मिळवत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. शाळेच्या वतीने अदिती गायकवाड हिचा विशेष सत्कार करण्यात येणार असून तिच्या यशामुळे संपूर्ण वरोरा परिसरात शाळेचे ...

*गरजू शेतमजूर महिलांना रेनकोट व छत्री वाटप*भाजपचे युवा नेतृत्व किशोर टोंगे यांचा स्तुत्य उपक्रम


*गरजू शेतमजूर महिलांना रेनकोट व छत्री वाटप*
भाजपचे युवा नेतृत्व किशोर टोंगे यांचा स्तुत्य उपक्रम 

चेतन लुतडे वरोरा 

सद्या पावसाळा सुरु असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. या भर पावसात देखील शेतकरी शेतमजूर महिलांना शेतीची कामे करावी लागतात. मात्र आजही अनेक महिलांना शेतात कामे करताना पावसापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोट किंवा अन्य पावसाळी साहित्य उपलब्ध नसते. यावेळी काही महिला गोणपाटपासून घोंगडी तयार करतात तर काही पावसात भिजतच काम करतात.

अशावेळी या शेतमजूर महिलांचे पावसापासून संरक्षण व्हावे किंवा त्यांचा किमान छोट्या पावसात बचाव व्हावा आणि दिवसभर त्यांना शेतकामे करता यावी या उद्देशाने गावागावात शेतात काम करणाऱ्या या महिलांना भाजपचे वरोरा-भद्रावती क्षेत्रातील युवा नेतृत्व तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर टोंगे यांनी शेतमजूर महिलांना रेनकोट तर गुराख्यांना छत्री वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला असून या उपक्रमाचे ग्रामीण भागात कौतुक होत आहे. 

यावेळी बोलताना किशोर टोंगे म्हणाले की, शेतकऱ्यांचे जीवन हे कायमच कष्टप्राय राहिले असून त्यांना ऊन पावसात काम करावं लागते. पावसाळ्यात महिलांना दिवसभर भिजत काम करावे लागते तर कधी अचानक पाऊस येऊन जातो यावेळी त्यांना किमान रेनकोट चा वापर करता यावा व आपल्या शरीराच सरंक्षण करता यावं या हेतूने माता भगिनींसाठी हा उपक्रम राबविला आहे. 

या रेनकोट व छत्रीच्या सुखद भेटीमुळे महिला भगिनी आनंदी झाल्या असून आमचे सरंक्षण व्हावे यासाठी ही भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले तर त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.


Comments