खाजगी शाळांच्या 'नफेखोरी'विरोधात कडक कायदा करा; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

खाजगी शाळांच्या 'नफेखोरी'विरोधात कडक कायदा करा; शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चंद्रपूर, दिनांक ११/३/२०२६: राज्यातील खाजगी शाळांकडून पालकांची होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. शाळांच्या आवारातच पुस्तके, वह्या व गणवेश यांच्या विक्रीतून सुरू असलेल्या नफेखोरीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने कडक कायदा करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी केली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेनेच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. वरोरा येथील सेंट ॲन्स पब्लिक स्कूलवर अलीकडेच कारवाई करण्यात आले होती.  राज्यातील बहुतांश खाजगी शाळांनी शिक्षणाचा पवित्र व्यवसाय बाजूला ठेवून व्यावसायिक नफेखोरीचा मार्ग अवलंबला आहे. शाळेच्या आवारातच पुस्तके, वह्या आणि गणवेशाची विक्री सक्तीची केली जाते. विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्याची सक्ती पालकांना केली जात असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत: · प...

साखरा -आब वडगाव कोरा पोच मार्गावरील अनेक गावाचा संपर्क तुटला

साखरा -आब वडगाव कोरा पोच मार्गावरील अनेक  गावाचा संपर्क तुटला

वरोरा 
  दिनांक १९/७/२०२४ ला झालेल्या मुसळधार पावसा मुळे मौजा साखरा येथील मार्गांवरील पुलाचे काम अर्धवट काम केले अल्यामुळे पुल वाहुन गेला सदर रहदारी साठी नागरिकांना सर्घष करावा लागत आहे.

      वरोरा तालुक्यातील साखरा -आब वडगाव ते कोरा जाणाऱ्या मार्गांवर पुलाचे काम संबंधित ठेकेदाराने वेळेवर पूर्ण न केल्यामुळे तसेच पी डब्लू. डी. ची निष्काळजीपणा मुळे पुलाचे काम अर्धवट राहिले आहे.नागरिकांना जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुले पुलाला लागून असलेल्या सीडी वरुन पूल पार करून शेतकऱ्यांना आपल्या शेतात जावे लागत आहे . मुसळधार पाऊस येत आहे परंतु जाणे येणेसाठी अर्धवट पूल अड्सर ठरला आहे. यामध्ये पि डब्लू डी आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप साखरा ग्रा. प. चे माजी सरपंच दिनेश मोहारे यांनी केला आहे.

 ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था नसते त्यामुळे साखरा, आब वडगाव येथील नागरिकांना शेगाव,वरोरा, चंद्रपूर या ठिकाणी उपचारासाठी  तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सुद्धा जावे लागते तसेच शाळेच्या मुलाना शाळेत जान्या करीता कोनताही पर्याय नसल्या मुळे शिक्षण बंद झाले आहे. अनेक गावांना रहदारीसाठी जोडणारा रस्त्यावरील पुलाचे काम ठेकेदाराने निर्धारित वेळेत पूर्ण न करता अर्धवट बांधकाम केले आहे. त्यामुले नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ प्रशासनाने या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे .

Comments