वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

साखरा -आब वडगाव कोरा पोच मार्गावरील अनेक गावाचा संपर्क तुटला

साखरा -आब वडगाव कोरा पोच मार्गावरील अनेक  गावाचा संपर्क तुटला

वरोरा 
  दिनांक १९/७/२०२४ ला झालेल्या मुसळधार पावसा मुळे मौजा साखरा येथील मार्गांवरील पुलाचे काम अर्धवट काम केले अल्यामुळे पुल वाहुन गेला सदर रहदारी साठी नागरिकांना सर्घष करावा लागत आहे.

      वरोरा तालुक्यातील साखरा -आब वडगाव ते कोरा जाणाऱ्या मार्गांवर पुलाचे काम संबंधित ठेकेदाराने वेळेवर पूर्ण न केल्यामुळे तसेच पी डब्लू. डी. ची निष्काळजीपणा मुळे पुलाचे काम अर्धवट राहिले आहे.नागरिकांना जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुले पुलाला लागून असलेल्या सीडी वरुन पूल पार करून शेतकऱ्यांना आपल्या शेतात जावे लागत आहे . मुसळधार पाऊस येत आहे परंतु जाणे येणेसाठी अर्धवट पूल अड्सर ठरला आहे. यामध्ये पि डब्लू डी आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप साखरा ग्रा. प. चे माजी सरपंच दिनेश मोहारे यांनी केला आहे.

 ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था नसते त्यामुळे साखरा, आब वडगाव येथील नागरिकांना शेगाव,वरोरा, चंद्रपूर या ठिकाणी उपचारासाठी  तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सुद्धा जावे लागते तसेच शाळेच्या मुलाना शाळेत जान्या करीता कोनताही पर्याय नसल्या मुळे शिक्षण बंद झाले आहे. अनेक गावांना रहदारीसाठी जोडणारा रस्त्यावरील पुलाचे काम ठेकेदाराने निर्धारित वेळेत पूर्ण न करता अर्धवट बांधकाम केले आहे. त्यामुले नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ प्रशासनाने या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे .

Comments