विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाईची मागणी.

 अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाईची मागणी.

चेतन लुतडे 

             भद्रावती तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने भद्रावती तालुक्यातील सर्व नदी, नाले, तळे, भरगच्च भरून वाहू लागले आहे. होणाऱ्या सतत मुसळधार पावसामुळे तालुका जलमय झाला असून, शेतामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे. त्याकरिता भद्रावती तालुका ओला दुष्काळ ग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी आम आदमी पार्टी द्वारा करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पेरणी करून नामांकित कंपनीचे बियाणे उगवले नाही उदाहरणात ओसवाल, विक्रांत, इ. शेतकऱ्यांवर आधीच दुबार पेरणीचे संकट आले असून यात अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन पेरणी करावी लागली आहे. या दुबार पेरणीने अनेक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत. 
 सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे भद्रावती तालुक्यातील नदी, नाले, तलाव, तुडुंब भरून वाहत असल्यामुळे भद्रावती तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी चक्क शेतातून वाहत असल्याने काही शेतात पाणीदेखील साचून राहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. यात सोयाबीन, तूर, कापूस, धान यासारख्या पिकांची मातीसह रोपटे वाहून गेले आहे. त्यामुळे भद्रावती तालुका हा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजाराची नुकसान भरपाई देण्याची मागणी उपस्थित  विकास गजभे, भारत बेलेकर, सूरज शाहा सुमित हस्थक यांनी केली आहे.

Comments