प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

उद्योगांना चालना देण्यासाठी 15 जुलै रोजी ‘इग्नाईट महाराष्ट्र’ कार्यक्रम*

*उद्योगांना चालना देण्यासाठी 15 जुलै रोजी ‘इग्नाईट महाराष्ट्र’ कार्यक्रम*

चंद्रपूर, दि. 11 : राज्यात उद्योग व उद्यमशीलता विकासासाठी राज्य शासनाच्या उद्योग संचालनालय, मुंबई च्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत आहेत. सदर योजनांचा लाभ अधिकाधिक उद्योजकांना मिळणे तसेच उद्योगांमध्ये गुंतवणूक, वृध्दी, निर्यात व ‘एक जिल्हा एक उत्पादन’ यावर (ODOP) सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रमावर आधारित 15 जुलै रोजी ‘इग्नाईट महाराष्ट्र’ यावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 जुलै रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 पर्यंत  नियोजन भवन, चंद्रपूर येथे सदर कार्यक्रम होणार आहे. उद्योग विभागतर्फे एम.एस.एम.ई क्षेत्रावर भर देवून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक  व्यापक करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात निमार्ण करणे, तसेच एक जिल्हा एक उत्पादन (ODOP)उपक्रम व निर्यात वृध्दीस चालना देण्यासाठी तसेच उद्योग विकासाठी राज्य व केंद्र शासनाचे विविध ‍विभाग, त्यांचे उपक्रम व योजना राबवित आहेत. त्यादृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेस सुक्ष्म, लघु, मध्यम घटक, निर्यातदार,  निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक समूह, औद्योगीक संस्था व संघटना,औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग विभागाने केले आहे.

००००००

Comments