मध्यमवर्गीय गृहकर्जदारांना २.५० लाखांची सबसिडी तात्काळ द्या; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

: मध्यमवर्गीय गृहकर्जदारांना २.५० लाखांची सबसिडी तात्काळ द्या; खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत मध्यमवर्गीय (एमआयजी) गृहकर्जदारांना देय असलेली ₹ २.५० लाखांची ‘क्रेडिट लिंक्ड सबसिडी’ तात्काळ वितरित करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारकडे जोरदारपणे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय आवासन व शहरी कार्य मंत्री मनोहर लाल यांना एक पत्र पाठवून चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो पात्र लाभार्थ्यांची प्रलंबित सबसिडीबाबत लक्ष वेधले आहे. खासदार धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, २०१७ ते २०२१ या कालावधीत बँकांकडून गृहकर्ज घेतलेल्या अनेक पात्र मध्यमवर्गीय लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत अपेक्षित सबसिडी मिळालेली नाही. ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ या संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, अनेक वर्षे उलटूनही ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने कर्जदारांवर २.५० लाख रुपयांच्या अतिरिक्त मुद्दलाचा तसेच त्यावर वाढत असलेल्या व्याजाचा मोठा आर्थिक बोजा पडत आहे. यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्...

*शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे थकीत वीज बिल माफ व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान *किशोर टोंगे यांच्या मागणीला यश

*शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे थकीत वीज बिल माफ व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान *
किशोर टोंगे यांच्या मागणीला यश

वरोरा :- 


          राज्यातील शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी संकटाबरोबरच अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असतो. या वर्षी देखील विदर्भातील शेतकऱ्यांना सोयाबीनची नापिकी झाली असून त्यासोबत कापूस, धान,इ. मालाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना शेती न परवडणारी झाली होती.

आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना आता कृषीपंपाचे वीज बिल अनेक शेतकऱ्यांना हजारोच्या घरात आलेली आहेत. आधीच शेतकरी हवालदिल झाला असताना त्याची पूर्ण वीज बिल भरण्याची परिस्थिती नव्हती.

त्यामुळे शासन स्तरावर आढावा घेऊन ते कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा व शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
तसेच शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी किशोर टोंगे यांनी आंदोलन केले होते व वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. या दोन्ही मागण्या आज अर्थसंकल्पात पूर्ण झाल्यात याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांनी नवीन वीज जोडणी साठी दोन ते तीन वर्षापासून अर्ज केलेले आहेत, डिमांड देखील भरलेले आहेत मात्र अद्याप त्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. त्यांना तात्काळ वीज जोडणी उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली व या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने महायुती सरकारचे आभार मानले.

Comments