खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कारउपशीर्षक: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार उपशीर्षक: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक पाटील पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे यांचे का...

जिल्ह्यातील अल्पवयीन वाहणचालकांवर कारवाई करा**शिवसेना शिंदे गटाचे पोलीस अधिक्षकांना निवेदन*अतुल कोल्हेभद्रावती.

*जिल्ह्यातील अल्पवयीन वाहणचालकांवर कारवाई करा*

*शिवसेना शिंदे गटाचे पोलीस अधिक्षकांना निवेदन*

अतुल कोल्हेभद्रावती. 
                काही दिवसांपूर्वी पुण्यात एका अल्पवयीन वाहनचालकाने बेजबाबदारपणे चारचाकी वाहण चालवून दोन निरपराध नागरिकांचा बळी घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातही अल्पवयीन दुचाकी तथा चारचाकी वाहन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.त्यामुळे भविष्यात येथे कोणतिही अनुचीत घटना घडू नये यासाठी त्वरीत दखल घेऊन जिल्ह्यात एक विषेश मोहिम राबवून अल्पवयीन वाहणचालकांवर कठोर कारवाई करावी व जिल्ह्यातील दारु तथा बारमालकांना अल्पवयीन युवकांना दारु विक्री न करण्याची सुचना द्यावी यासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे जिल्हा संघटक अड. युवराज धानोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधिक्षकांना एक निवेदन देण्यात आले आहे. अल्पवयीन वाहनचालकांकडून जिल्ह्यत बेजबाबदारपणे दुचाकी व चारचाकी वाहणे चालविण्याने याआधी अनेक अपघात घडले आहे. या अपघातांमधे अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेल्याची उदाहरणे आहेत.या बेलगाम वाहणधारकांमुळे पादचारी नागरीकांत भिती निर्माण झाली आहे.याशिवाय बार व दारु दुकान मालकांकडून अल्पवयीन युवकांना दारु विक्री केल्या जात असल्याचे आढळून येत आहे.या प्रकारावर त्वरित आळा घालून अल्पवयीन वाहणचालकांवर कारवाईची मोहीम सुरु करावी अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे.या गंभीर विषयाची त्वरीत दखल न घेतल्यास शिवसेनेतर्फे जिल्ह्यात सर्वत्र जन आंदोलन ऊभारण्याचा ईशाराही देण्यात आला आहे.निवेदन सादर करतांना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक अड. युवराज धानोरकर, जिल्हा प्रमुख बंडू हजारे, विधानसभा संघटक नरेश काळे,चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी, अरविंद धिमान आदी ऊपस्थीत होते.

Comments