वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

*निलेश कराळे यांच्यावर गुन्हा दाखल करा**वरोडा येथे उत्तरवार मित्रपरिवारांची मागणी !* *वरोडा पोलीसांना दिले मागणीचे निवेदन*

*निलेश कराळे यांच्यावर गुन्हा दाखल करा*

*वरोडा येथे उत्तरवार मित्रपरिवारांची मागणी !* 

*वरोडा पोलीसांना दिले मागणीचे निवेदन*

वरोडा: शाम ठेंगडी 

           वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
      देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांच्या विरोधात आर्वाच्य भाषेत शिवीगाळ व अपशब्द वापरणाऱ्या निलेश कराळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वरोडा येथील किशोर उत्तरवार व मित्र परिवारांनी आज 25 एप्रिल रोज गुरुवारचा वरोडा येथील पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
         सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना या रणधुमाळीत व्हाट्सअप,युट्युब व विविध माध्यमांवर निलेश कराळे यांच्या भाषणाची एक क्लिप प्रसारित होत आहे. ज्यात त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमितजी शहा यांचे विषयी अभद्र व अत्यंत खालच्या पातळीत शिवीगाळ करून वक्तव्य केलेले आहे. मोदी हे लोकशाही पद्धतीने देशाचे निर्वाचित पंतप्रधान असून हे पद कोणत्याही पक्षाचे नव्हे तर देशाचे संवैधानिक पद आहे. ते संपूर्ण देशाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. म्हणून त्यांचा अपमान करणे म्हणजे त्या सर्वोच्च पदाचा  पर्यायाने देशाचा अपमान करणे आहे. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांना सार्वजनिक रित्या शिवीगाळ करणे,त्यांच्याविषयी अभद्र वक्तव्य करणे हे समाजात तेढ निर्माण करून असंतोष निर्माण करणारे आहे. म्हणून आम्ही भारताचे सुज्ञ नागरिक म्हणून निलेश कराळे यांच्यावर भारतीय दंड विधानानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी व समाजात तेढ व द्वेष भावना निर्माण करून असंतोष फैलावणे अशा विविध कलमांतर्गत त्यांचेवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी किशोर उत्तरवार व मित्रपरिवाराने आज सायंकाळी वरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Comments