प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

पानवडाळा येथे २६ एप्रिलला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन**माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची उपस्थिती*

*पानवडाळा येथे २६ एप्रिलला  प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन*

*माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची उपस्थिती*

 अतुल कोल्हे भद्रावती :
                  तालुक्यातील पानवडाळा येथे शुक्रवार दि. २६ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता अरविंडो रियालिटी इफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कोळसा खान प्रल्पसंदर्भात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या पटांगणावर हंसराजभैय्या अहिर, अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग तथा माजी मंत्री भारत सरकार ,यांच्या मार्गदर्शनाखाली तथा नेतृत्वात टाकळी, जेना, बेलोरा उत्तर व दक्षिण कोळसा खदानी मार्फत होणाऱ्या भुसंपादन आणि पुनर्वसन आणि रोजगार बद्दल समस्या जाणून घेण्याकरिता तसेच सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी  संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आहे.
    या मेळाव्यात धनंजय पिंपळशेंडे वरोरा, नरेंद्र जिवतोडे हे प्रामुख्याने उपस्थित राहतील.प्रकल्प ग्रस्तांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रकल्प ग्रस्तांच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेता निराकरण करण्यासाठी तयारी करावयाची आहे. यामध्ये                           प्रकल्पाकरिता लागणाऱ्या जमिनीचे संपादन योग्य कालावधी मध्ये करण्यात यावे,                         जमिनिचा योग्य मोबदला मिळण्याबाबत,                             बेलोरा गावाचे पुनर्वसन योग्य कालावधी मध्ये योग्य ठिकाणी करण्याबाबत,स्थानिक प्रकल्पग्रस्त व युवकांना योग्य मोबदला देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. या प्रमुख मागण्यांचा समावेश असणार आहे . या संवाद मेळाव्यात मौजा पानवडाळा, टाकळी, जेना, बेलोरा, डोंगरगांव खडी,किलोनी,कान्सा सिरपुर येथील  प्रकल्प ग्रस्त शेकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत पानवडाळाचे सरपंच प्रदीप महाकुलकर यांनी केले आहे.

Comments