वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

चारगाव वर्धा नदीतून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी : संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष*.

*चारगाव वर्धा नदीतून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी : संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष*.

अतुल कोल्हे भद्रावती :-
               भद्रावती शहर तथा तालुक्यात अवैध रेती तस्करीला मोठे उधान आले असून आता चारगाव रेती घाटावरून सुद्धा रात्रीच्या वेळेस ट्रॅक्टरच्या सहाय्याने  रेतीची मोठी तस्करी होत आहे. मात्र याकडे महसूल व पोलीस विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहे. वेकोलीच्या एकता नगर वसाहतीलगत चारगाव रस्ता जातो  हा रस्ता नदीपर्यंत जात असल्यामुळे या घाटाकडे अवैध रेतीमाफि यांनी आपले लक्ष केंद्रित केलेले आहे.
 या घाटावरून रोज-रात्रोला मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केल्या जाते. या अवैध रेती तस्करीमुळे महसूल विभागाचे कोट्यवधीची रुपयाचे नुकसान होत आहे .रेती तस्कर मात्र या गोरख धंद्यातून अमाप पैसा कमवीत आहे. या नदी घाटावरून होत असलेले नियमित रेती तस्करी अधिकाऱ्यांच्या लक्षात कसे येत नाही? हा प्रश्न सर्वसाधारन नागरिकांना पडला आहे. चंदनखेडा परिसरात त्या भागातील रेती तस्करावर अनेकदा कारवाया करण्यात आल्या मात्र या घाटावरून अवैध रेती तस्करी करणाऱ्या शहरातील रेती तस्करावर का कारवाई होत नाही, हे एक कोडेच आहे. आता तरी या रेती तस्करी कडे  महसूल विभागाचे लक्ष जाईल काय? हा प्रश्न नागरिकांतर्फे विचारण्यात येत आहे.

Comments