वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला

वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला वरोरा, ता. ४ मार्च : "तू माझ्याशी बोलत का नाही? माझा फोन का उचलत नाही?" असे म्हणत एका तरुणाने एका विवाहित महिलेवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी उघडकीस आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील यात्रा वार्ड प्रभाग सात मधील परिसरात ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, ४० वर्षीय राखी अजय लिहितकर या सहा वर्षांपूर्वी भद्रावती येथील एका पेट्रोल पंपावर कार्यरत होत्या. तेथेच त्यांची ओळख विक्की बावणे याच्याशी झाली होती. तेव्हापासून विक्की हा राखी यांना भेटण्यासाठी येत असे आणि वारंवार फोन करून त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून राखी यांनी याबाबत आपले पती अजय लिहितकर यांना माहिती दिली. अजय यांनी विक्कीला ताडून पुन्हा फोन न करण्याची धमकी दिली. मात्र, धुळवंदनाच्या दिवशी विक्की हा थेट राखी यांच्या घरी पोहोचला. राखी यांनी दरवाजा उघडताच, विक्कीने "तू माझा फोन का उचलत नाही? तुझा मर्डर करून टाकीन," अशी भीषण धमकी देत कंबरेतून चाकू काढून...

चारगाव वर्धा नदीतून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी : संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष*.

*चारगाव वर्धा नदीतून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी : संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष*.

अतुल कोल्हे भद्रावती :-
               भद्रावती शहर तथा तालुक्यात अवैध रेती तस्करीला मोठे उधान आले असून आता चारगाव रेती घाटावरून सुद्धा रात्रीच्या वेळेस ट्रॅक्टरच्या सहाय्याने  रेतीची मोठी तस्करी होत आहे. मात्र याकडे महसूल व पोलीस विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहे. वेकोलीच्या एकता नगर वसाहतीलगत चारगाव रस्ता जातो  हा रस्ता नदीपर्यंत जात असल्यामुळे या घाटाकडे अवैध रेतीमाफि यांनी आपले लक्ष केंद्रित केलेले आहे.
 या घाटावरून रोज-रात्रोला मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केल्या जाते. या अवैध रेती तस्करीमुळे महसूल विभागाचे कोट्यवधीची रुपयाचे नुकसान होत आहे .रेती तस्कर मात्र या गोरख धंद्यातून अमाप पैसा कमवीत आहे. या नदी घाटावरून होत असलेले नियमित रेती तस्करी अधिकाऱ्यांच्या लक्षात कसे येत नाही? हा प्रश्न सर्वसाधारन नागरिकांना पडला आहे. चंदनखेडा परिसरात त्या भागातील रेती तस्करावर अनेकदा कारवाया करण्यात आल्या मात्र या घाटावरून अवैध रेती तस्करी करणाऱ्या शहरातील रेती तस्करावर का कारवाई होत नाही, हे एक कोडेच आहे. आता तरी या रेती तस्करी कडे  महसूल विभागाचे लक्ष जाईल काय? हा प्रश्न नागरिकांतर्फे विचारण्यात येत आहे.

Comments