वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला

वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला वरोरा, ता. ४ मार्च : "तू माझ्याशी बोलत का नाही? माझा फोन का उचलत नाही?" असे म्हणत एका तरुणाने एका विवाहित महिलेवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी उघडकीस आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील यात्रा वार्ड प्रभाग सात मधील परिसरात ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, ४० वर्षीय राखी अजय लिहितकर या सहा वर्षांपूर्वी भद्रावती येथील एका पेट्रोल पंपावर कार्यरत होत्या. तेथेच त्यांची ओळख विक्की बावणे याच्याशी झाली होती. तेव्हापासून विक्की हा राखी यांना भेटण्यासाठी येत असे आणि वारंवार फोन करून त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून राखी यांनी याबाबत आपले पती अजय लिहितकर यांना माहिती दिली. अजय यांनी विक्कीला ताडून पुन्हा फोन न करण्याची धमकी दिली. मात्र, धुळवंदनाच्या दिवशी विक्की हा थेट राखी यांच्या घरी पोहोचला. राखी यांनी दरवाजा उघडताच, विक्कीने "तू माझा फोन का उचलत नाही? तुझा मर्डर करून टाकीन," अशी भीषण धमकी देत कंबरेतून चाकू काढून...

भद्रावती बाजार समितीची कापूस व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई*

*भद्रावती बाजार समितीची कापूस व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई*

अतूल कोल्हे भद्रावती

               दिनांक 03 मार्च 2024 रोज रविवारला मोहनदास हनुमान ठाकरे राहणार चिरादेवी या शेतकऱ्यांनी आपला कापूस वसंता माणिक वंजारी रा. मेसा यांना विकत असताना शेतकऱ्यांच्या लक्षात आले की वजन काट्यामध्ये मध्ये फरक आहे. असे त्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना म्हटले. परंतु ते व्यापारी समजायला तयार नव्हते. त्यांनी तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे  सचिव श्री. नागेश पुनवटकर यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ बाजार समितीचे निरीक्षक श्री. संजय शेंडे लिपिक श्री. विलास पालकर यांना बोलावून  श्री. मोहनदास हनुमान ठाकरे रा. चिरादेवी यांचे घरी जाऊन श्री. वसंता माणिक वंजारी रा. मेसा कापूस खरेदी करत असताना त्यांच्यावर बाजार समितीच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई करून दंड, बाजार फी, सुपरव्हिजन फी, अशी एकून रक्कम  15000/- रुपये  वसूल करण्यात आले.  यापुढे   भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांनी खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना आपला  कापूस व अन्य शेतमाल  विकू नये, शेतमाल खरेदी करताना आढळल्यास,  बाजार समितीच्या नियमानुसार व्यापाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल उपबाजार आवार चंदनखेडा, नंदोरी येथेच विकावा. असे आवाहन बाजार समितीचे सभापती श्री. भास्कर ताजणे, उपसभापती सौ.अश्लेषा भोयर  (जीवतोडे ) सचिव नागेश पुनवटकर व बाजार समितीचे सर्व संचालक यांनी केले आहे.

Comments