वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

केपीसीएल कंपनीच्या लेखी पत्रानंतर बरांज आंदोलन कर्ता महिला खड्ड्याच्या बाहेर**आठ दिवस राहिल्या खुल्या कोळसा खाणीत*

*केपीसीएल कंपनीच्या लेखी पत्रानंतर बरांज आंदोलन कर्ता महिला खड्ड्याच्या बाहेर*

*आठ दिवस राहिल्या खुल्या कोळसा खाणीत*
अतुल कोल्हे भद्रावती -  
            केपीसीएल कंपनीच्या विरोधात आंदोलन कर्ता महिला दिनांक 9 फेब्रुवारीला खुला कोळसा खाणीच्या खड्ड्यात उतरल्या आपल्या मागण्यावर ठाम राहून त्या तब्बल आठ दिवसानंतर केपीसीएल कंपनीने लेखी पत्र दिल्यानंतर त्या खड्ड्याच्या बाहेर निघाल्या मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे .
 बरांज प्रकल्पग्रस्त महिलांच्या आंदोलनाचा आजचा ६८ वा दिवस आहे खड्ड्यातील आंदोलनाचा आठवा दिवस होता दिनांक 14 फेब्रुवारीला जिल्हा अधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालयात बैठक झाली त्यामध्ये आंदोलनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला सक्त निर्देश दिले .
त्यानंतर केपीसीएल कंपनीने पुनर्वसन टीम गठीत केलेली आहे सदर टीम पुनर्वसनस्थळी कॅम्प करून लवकरात लवकर पुनर्वसनाची प्रक्रिया करेल असे लेखी आश्वासनाचे पत्र कंपनीच्या वतीने त्या दहा आंदोलन करत्यांना देण्यात आले यावेळी कंपनीचे अधिकारी, ठाणेदार बिपिन इंगळे, महिलांच्या वतीने विनोद खोब्रागडे आदी उपस्थित होते .
 [पंचशीला कांबळे, माधुरी वाढई , पल्लवी कोरडे, माधुरी निखाडे , रंजना शेरके, सरस्वती मेश्राम, मंजू कुळसंगे, माया कोवे या दहा महिला खुल्या कोळसा खाणीच्या खड्ड्यात उतरून आंदोलन करत होत्या. 

Comments