विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

उत्पादन शुल्क विभाग अवैध दारू विक्रीवर आळा घालणार काय? : सुज्ञ नागरिकांचा सवाल*

*उत्पादन शुल्क विभाग अवैध दारू विक्रीवर आळा घालणार काय? : सुज्ञ नागरिकांचा सवाल*

अतुल कोल्हे भद्रावती:
               दारूबंदी उठल्यानंतर शहरात ज्याप्रमाणे शासनमान्य  दारू दुकानात वाढ झाली. त्याच वेगाने घरोघरी अवैध दारू विक्री करण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.ही अवैध दारू दुकाने ज्या वस्तीमध्ये आहे. तेथील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे आता तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच स्थानिक पोलीस लक्ष देतील काय?असावा सवाल नागरिक करीत आहे.
       शहरात तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भर वस्तीमध्येच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी आपापल्या घरीच दारूचे दुकाने सुरू केलीत.ती २४ तास सुरू असतात. या दुकानदारांना स्थानिक परवानेधारक दुकानदार दारूचा पुरवठा करतात. तसेच शहरालगतच्या तांडा वस्ती मधून हातभट्टीची दारू सुद्धा तिथे पुरवल्या जाते. हातभट्टीची दारू अनेकांच्या जीवावर बेतून त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.या अवैध दारू दुकानामुळे वस्तीतील इतर नागरिकांना त्याचा त्रास होऊन त्यांचे सामाजिक, कौटुंबिक वातावरण खराब होत आहे. आता तरी याकडे दोन्ही विभागाने लक्ष देऊन कारवाई करून ही अवैध दारूची दुकाने कायमची बंद करावी.अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.

Comments