खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

उत्पादन शुल्क विभाग अवैध दारू विक्रीवर आळा घालणार काय? : सुज्ञ नागरिकांचा सवाल*

*उत्पादन शुल्क विभाग अवैध दारू विक्रीवर आळा घालणार काय? : सुज्ञ नागरिकांचा सवाल*

अतुल कोल्हे भद्रावती:
               दारूबंदी उठल्यानंतर शहरात ज्याप्रमाणे शासनमान्य  दारू दुकानात वाढ झाली. त्याच वेगाने घरोघरी अवैध दारू विक्री करण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.ही अवैध दारू दुकाने ज्या वस्तीमध्ये आहे. तेथील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे आता तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच स्थानिक पोलीस लक्ष देतील काय?असावा सवाल नागरिक करीत आहे.
       शहरात तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भर वस्तीमध्येच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी आपापल्या घरीच दारूचे दुकाने सुरू केलीत.ती २४ तास सुरू असतात. या दुकानदारांना स्थानिक परवानेधारक दुकानदार दारूचा पुरवठा करतात. तसेच शहरालगतच्या तांडा वस्ती मधून हातभट्टीची दारू सुद्धा तिथे पुरवल्या जाते. हातभट्टीची दारू अनेकांच्या जीवावर बेतून त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.या अवैध दारू दुकानामुळे वस्तीतील इतर नागरिकांना त्याचा त्रास होऊन त्यांचे सामाजिक, कौटुंबिक वातावरण खराब होत आहे. आता तरी याकडे दोन्ही विभागाने लक्ष देऊन कारवाई करून ही अवैध दारूची दुकाने कायमची बंद करावी.अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.

Comments