वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करा**कचराळा ग्रामपंचायतचे तहसीलदारांना निवेदन*

*नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करा*

*कचराळा ग्रामपंचायतचे तहसीलदारांना निवेदन*
अतुल कोल्हे भद्रावती.
            दोन दिवसांपूर्वी भद्रावती तालुक्यात गारपिटासह वादळी पाऊस झाला. या वादळामुळे तालुक्यातील अन्य गावांसह कचराळा गावातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे 90% नुकसान झाले. त्यामुळे कचरा गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कचराळा  ग्रामपंचायतीतर्फे तहसीलदार यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. खरिपाचा हंगामा आधीच समाधानकारक गेला नसल्याने येथील शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. सध्या शेतात रब्बी पीक उभे आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी तालुक्यात गारपिटासह भयानक वादळी पाऊस झाला. या गारपिटात शेतातील गहू, हरभरा, मिरची, ज्वारी, मुग तथा भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गारपिटीमुळे गावातील 90% रब्बी पीक उध्वस्त झाल्याने येथील शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले.त्यामुळे या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देऊन गावातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कचराळा  ग्रामपंचायत कार्यालयातर्फे तहसीलदारांना  दिलेल्या  निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना सरपंच सीमा कुळमेथे, नितेश येरगुडे, संदीप निखाडे, कपिल झाडे. शुभम झाडे, पंकज उरकुडे, भैय्याजी बोबडे, प्रकाश सोमलकर, भाऊराव मोहितकर, छत्रपती एकरे तथा गावकरी उपस्थित होते.

किशोर डुकरे यांचे आमरण उपोषण सुरू.


Comments