वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करा**कचराळा ग्रामपंचायतचे तहसीलदारांना निवेदन*

*नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करा*

*कचराळा ग्रामपंचायतचे तहसीलदारांना निवेदन*
अतुल कोल्हे भद्रावती.
            दोन दिवसांपूर्वी भद्रावती तालुक्यात गारपिटासह वादळी पाऊस झाला. या वादळामुळे तालुक्यातील अन्य गावांसह कचराळा गावातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे 90% नुकसान झाले. त्यामुळे कचरा गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कचराळा  ग्रामपंचायतीतर्फे तहसीलदार यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. खरिपाचा हंगामा आधीच समाधानकारक गेला नसल्याने येथील शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. सध्या शेतात रब्बी पीक उभे आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी तालुक्यात गारपिटासह भयानक वादळी पाऊस झाला. या गारपिटात शेतातील गहू, हरभरा, मिरची, ज्वारी, मुग तथा भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गारपिटीमुळे गावातील 90% रब्बी पीक उध्वस्त झाल्याने येथील शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले.त्यामुळे या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देऊन गावातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कचराळा  ग्रामपंचायत कार्यालयातर्फे तहसीलदारांना  दिलेल्या  निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना सरपंच सीमा कुळमेथे, नितेश येरगुडे, संदीप निखाडे, कपिल झाडे. शुभम झाडे, पंकज उरकुडे, भैय्याजी बोबडे, प्रकाश सोमलकर, भाऊराव मोहितकर, छत्रपती एकरे तथा गावकरी उपस्थित होते.

किशोर डुकरे यांचे आमरण उपोषण सुरू.


Comments