वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

विद्युत प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय रद्द करा**

*विद्युत प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय  रद्द करा*

*भद्रावती वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन*
अतुल कोल्हे भद्रावती :-
              महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर्फे सर्वत्र प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा नागरिकांवर अन्याय आहे. त्यामुळे सदर मीटर लावण्याचे काम त्वरित थांबवून सदर प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी भद्रावती वंचित बहुजन आघाडी तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा विद्युत निर्मिती करणारा जिल्हा आहे. वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा हा सुद्धा जिल्ह्यातच उपलब्ध आहे. या जिल्ह्यात प्रदूषण निर्माण होऊन त्याचा त्रास जिल्ह्यातील नागरिकांना सोसावा लागत आहे. अशा अवस्थेत विद्युत विभागाने प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेऊन शहरातील तथा जिल्ह्यातील गोरगरिबांवर अन्याय केला आहे. सध्या विज बिल भरण्यासाठी चाळीस दिवसांचा अवधी दिला जातो. मात्र प्रीपेड मीटर लावल्यानंतर मुदत मिळत नसल्याने गोरगरिबांच्या घरात अंधार होण्याची शक्यता आहे. तरी हा निर्णय रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडीचे विशाल कांबळे, हरिहर थुलकर, विठ्ठल पुनवटकर,डी.एस. रामटेके, अनुराग खाडे, सतीश मस्के, राखीताई रामटेके, संध्याताई पेटकर आदी उपस्थित होते.

Comments