वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

विद्युत प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय रद्द करा**

*विद्युत प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय  रद्द करा*

*भद्रावती वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन*
अतुल कोल्हे भद्रावती :-
              महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तर्फे सर्वत्र प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा नागरिकांवर अन्याय आहे. त्यामुळे सदर मीटर लावण्याचे काम त्वरित थांबवून सदर प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी भद्रावती वंचित बहुजन आघाडी तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा विद्युत निर्मिती करणारा जिल्हा आहे. वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा हा सुद्धा जिल्ह्यातच उपलब्ध आहे. या जिल्ह्यात प्रदूषण निर्माण होऊन त्याचा त्रास जिल्ह्यातील नागरिकांना सोसावा लागत आहे. अशा अवस्थेत विद्युत विभागाने प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेऊन शहरातील तथा जिल्ह्यातील गोरगरिबांवर अन्याय केला आहे. सध्या विज बिल भरण्यासाठी चाळीस दिवसांचा अवधी दिला जातो. मात्र प्रीपेड मीटर लावल्यानंतर मुदत मिळत नसल्याने गोरगरिबांच्या घरात अंधार होण्याची शक्यता आहे. तरी हा निर्णय रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडीचे विशाल कांबळे, हरिहर थुलकर, विठ्ठल पुनवटकर,डी.एस. रामटेके, अनुराग खाडे, सतीश मस्के, राखीताई रामटेके, संध्याताई पेटकर आदी उपस्थित होते.

Comments