वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

निःशुल्क दर्द रोग निवारण शिबिर संपन्न**भद्रावतीत केरलीय पंचकर्म ट्रेनिंग इन्स्टिट्यूट द्वारा आयोजन**शंभरहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ*

*निःशुल्क दर्द रोग निवारण शिबिर संपन्न*

*भद्रावतीत केरलीय पंचकर्म ट्रेनिंग इन्स्टिट्यूट द्वारा आयोजन*

*शंभरहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ*

अतुल कोल्हे भद्रावती : 
           केरलीय पंचकर्म ट्रेनिंग इन्स्टिट्यूट द्वारा निःशुल्क दर्द रोग निवारण शिबिर दि.४ फेब्रुवारी ला स्थानिक हनुमान मंदिर, संताजी नगर येथे संपन्न झाले. 
         डॉ. लोहर्णा मंगरुळकर, डॉ. अभिनव आकरे यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिराचा जवळपास शंभरहुन अधिक नागरिकांनी लाभ घेतला. 
             यामधे वातदोष, लकवा, पाठीचे दुखणे, मानेचे दुखणे, कंबर दुखी, गुडघेदुखी, सायटिका, नस लागणे, हाला हाळांमधिल गॅप, मायग्रेन, झोप न येणे डिप्रेशन, चक्कर येणे, जुनी डोकेदुखी, जुनी सर्दी, दमा, एलर्जी, श्वास फुलने, अपचन, पाईल्स, फिशर, आदि रोगांवर पंचकर्माच्या माध्यमातून उपचार करण्यात आला. 
             या शिबिराला यशस्वी करण्यासाठी डॉ. समृद्धी मंगरुळकर, डॉ. वैष्णव मंगरुळकर, प्रा. रविकांत वरारकर, रितेश वाढई, कवीश्वर शेंडे, प्रशांत झाडे, चंद्रशेखर मंगरुळकर, सुनील डांगे, संजय मंगरुळकर, दीपक निकुरे, मिथिलेश लाखे, गुलशन आष्टनकर, पुरुषोत्तम नैताम, गोपाळ ताजने, मंगेश अंड्रस्कर, अनिल तुमसरे, युगेश खोब्रागडे, नौशाद अली, छोटू धकाते, शिवा कोंबे, महेश कोथळे, निखिल तुमसरे, गौरी बिलोरे, आदींनी परीश्रम घेतले.

Comments