प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

निःशुल्क दर्द रोग निवारण शिबिर संपन्न**भद्रावतीत केरलीय पंचकर्म ट्रेनिंग इन्स्टिट्यूट द्वारा आयोजन**शंभरहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ*

*निःशुल्क दर्द रोग निवारण शिबिर संपन्न*

*भद्रावतीत केरलीय पंचकर्म ट्रेनिंग इन्स्टिट्यूट द्वारा आयोजन*

*शंभरहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ*

अतुल कोल्हे भद्रावती : 
           केरलीय पंचकर्म ट्रेनिंग इन्स्टिट्यूट द्वारा निःशुल्क दर्द रोग निवारण शिबिर दि.४ फेब्रुवारी ला स्थानिक हनुमान मंदिर, संताजी नगर येथे संपन्न झाले. 
         डॉ. लोहर्णा मंगरुळकर, डॉ. अभिनव आकरे यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिराचा जवळपास शंभरहुन अधिक नागरिकांनी लाभ घेतला. 
             यामधे वातदोष, लकवा, पाठीचे दुखणे, मानेचे दुखणे, कंबर दुखी, गुडघेदुखी, सायटिका, नस लागणे, हाला हाळांमधिल गॅप, मायग्रेन, झोप न येणे डिप्रेशन, चक्कर येणे, जुनी डोकेदुखी, जुनी सर्दी, दमा, एलर्जी, श्वास फुलने, अपचन, पाईल्स, फिशर, आदि रोगांवर पंचकर्माच्या माध्यमातून उपचार करण्यात आला. 
             या शिबिराला यशस्वी करण्यासाठी डॉ. समृद्धी मंगरुळकर, डॉ. वैष्णव मंगरुळकर, प्रा. रविकांत वरारकर, रितेश वाढई, कवीश्वर शेंडे, प्रशांत झाडे, चंद्रशेखर मंगरुळकर, सुनील डांगे, संजय मंगरुळकर, दीपक निकुरे, मिथिलेश लाखे, गुलशन आष्टनकर, पुरुषोत्तम नैताम, गोपाळ ताजने, मंगेश अंड्रस्कर, अनिल तुमसरे, युगेश खोब्रागडे, नौशाद अली, छोटू धकाते, शिवा कोंबे, महेश कोथळे, निखिल तुमसरे, गौरी बिलोरे, आदींनी परीश्रम घेतले.

Comments