वरोरा येथे पुलाच्या कामासाठी खड्डा उघडा ठेवल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी; विभाग व कंत्राटदारावर कारवाईची मागणी

वरोरा येथे पुलाच्या कामासाठी खड्डा उघडा ठेवल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी;  विभाग व कंत्राटदारावर कारवाईची मागणी वरोरा, (२७/३/२६): सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात दोघे तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. बोर्ड ते पावना या मार्गावरील पुलाच्या बांधकामासाठी रस्त्यावर उघडा ठेवलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकी पडल्याने हा अपघात झाला. जखमी तरुणांवर नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली असून, एकाच्या डोक्याचे ऑपरेशन बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. आकाश येकांजी बारसागडे (वय २९, रा. कॉलरी वॉर्ड, वरोरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास ते त्यांचे मित्र अंकित गजानन करडभूजे (वय २७) व गोपाल पुरुषोत्तम विरुटकर हे तिघे दुचाकी (क्र. एम.एच. ३४ बीएक्स ४४९४) ने आगरा येथून परत येत होते. अंधार असताना पुलाच्या कामाजवळ कोणतेही दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर किंवा सुरक्षा बंधारे नव्हते. फक्त पांढरी पट्टी होती, मात्र तीही व्यवस्थित दिसत नव्हती. त्यामुळे पुढे मोठा खड्डा असल्याचे ...

निष्क्रिय शासनाच्या विरोधात तुमगाव येथील शेतकऱ्याची गावबंदी.*गावातील शाळा ग्रामपंचायत व इतर शासकीय कार्यालये बंद .

निष्क्रिय शासनाच्या विरोधात तुमगाव येथील शेतकऱ्याची गावबंदी.
*
गावातील शाळा ग्रामपंचायत व इतर शासकीय कार्यालये बंद .



वरोरा
चेतन लुतडे

वरोरा शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असणारे मांगली- तुंमगाव मागील कित्येक वर्षापासून शासकीय योजनेपासून आणि सुख सुविधांपासून वंचित आहे. शासनाला बरेचदा मागण्या निवेदन सादर केले परंतु कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून या गावात येणारी शासकीय यंत्रणा बंद करण्यात आली आहे.
गावकऱ्यांनी गावात येणाऱ्या रोडच्या मधोमध बैल बंड्या आडव्या करून शासकीय यंत्रणेला बंदी घातली आहे. यावेळी गावातील जनतेने "शासन मुर्दाबाद शेतकरी जिंदाबाद," कामचुकार अधिकाऱ्यांचा निषेध असो. पाझरबोडी तलाव झालाच पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे., असे अनेक नारे देत रस्ता अडवून धरला आहे. यावेळी शासकीय यंत्रणेला गावातील लोक काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करत आहे.

गावकऱ्यांनी शासनाला आपल्या मागण्या सादर केले आहे जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत गाव बंदी उठणार नाही असा निर्णय या गावकऱ्यांनी घेतला आहे.

                       जलसंधारण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे तूमगाव मधील 30 ते 40  वर्षापासून अपूर्ण बांधकाम झालेले पाझर तलावा मुळे  अंदाजे १५० एकर जमीन दरवर्षी पुरबुडी  मध्ये जाते आहे. याची दखल अजून पर्यंत सरकारने घेतली नाही.

सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोग आल्याने शेतकऱ्याची नुकसान भरपाई अजून पर्यंत सरकारने दिली नाही.


शासन द्वारा   राबविण्यात येणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना पासून ९०%शेतकरी अजूनही वंचित आहेत
गारपीठ झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे परंतु अजूनही  कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही.
 
गावाला येण्यार्या रोडची दुरावस्था झालेली आहे.
अशा बऱ्याच मागण्यांकरिता शासनाच्या विरुद्ध गाव बंदी केली असून असेच उदासीन प्रशासकीय यंत्रणा राहिल्यास  येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत गावकरी बहिष्कार टाकणार अशी माहिती त्यांनी दिली आहे.



Comments