वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

निष्क्रिय शासनाच्या विरोधात तुमगाव येथील शेतकऱ्याची गावबंदी.*गावातील शाळा ग्रामपंचायत व इतर शासकीय कार्यालये बंद .

निष्क्रिय शासनाच्या विरोधात तुमगाव येथील शेतकऱ्याची गावबंदी.
*
गावातील शाळा ग्रामपंचायत व इतर शासकीय कार्यालये बंद .



वरोरा
चेतन लुतडे

वरोरा शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असणारे मांगली- तुंमगाव मागील कित्येक वर्षापासून शासकीय योजनेपासून आणि सुख सुविधांपासून वंचित आहे. शासनाला बरेचदा मागण्या निवेदन सादर केले परंतु कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून या गावात येणारी शासकीय यंत्रणा बंद करण्यात आली आहे.
गावकऱ्यांनी गावात येणाऱ्या रोडच्या मधोमध बैल बंड्या आडव्या करून शासकीय यंत्रणेला बंदी घातली आहे. यावेळी गावातील जनतेने "शासन मुर्दाबाद शेतकरी जिंदाबाद," कामचुकार अधिकाऱ्यांचा निषेध असो. पाझरबोडी तलाव झालाच पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे., असे अनेक नारे देत रस्ता अडवून धरला आहे. यावेळी शासकीय यंत्रणेला गावातील लोक काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करत आहे.

गावकऱ्यांनी शासनाला आपल्या मागण्या सादर केले आहे जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत गाव बंदी उठणार नाही असा निर्णय या गावकऱ्यांनी घेतला आहे.

                       जलसंधारण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे तूमगाव मधील 30 ते 40  वर्षापासून अपूर्ण बांधकाम झालेले पाझर तलावा मुळे  अंदाजे १५० एकर जमीन दरवर्षी पुरबुडी  मध्ये जाते आहे. याची दखल अजून पर्यंत सरकारने घेतली नाही.

सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोग आल्याने शेतकऱ्याची नुकसान भरपाई अजून पर्यंत सरकारने दिली नाही.


शासन द्वारा   राबविण्यात येणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना पासून ९०%शेतकरी अजूनही वंचित आहेत
गारपीठ झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे परंतु अजूनही  कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही.
 
गावाला येण्यार्या रोडची दुरावस्था झालेली आहे.
अशा बऱ्याच मागण्यांकरिता शासनाच्या विरुद्ध गाव बंदी केली असून असेच उदासीन प्रशासकीय यंत्रणा राहिल्यास  येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत गावकरी बहिष्कार टाकणार अशी माहिती त्यांनी दिली आहे.