वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वरोऱ्यात मिठाईच्या दराने विकले जात आहे खरड्याचे डबे*वैधमापन विभागाचे दुर्लक्ष

वरोऱ्यात मिठाईच्या दराने विकले जात आहे खरड्याचे डबे
*वैधमापन विभागाचे दुर्लक्ष

अनिल पाटील 
वरोरा 

वरोरा : कोणत्या वस्तूला केंव्हा कोणती किंमत येईल हे सांगता येत नसले तरी ग्राहकांना बनवून कोणती वस्तू कोणत्या दराने विकायची याची किमया व्यवसायिकांना चांगलीच  ठाऊक असते असे म्हणायला हरकत नाही. याचा प्रत्यय वरोरा येथे येत असून शहरातील काही मिठाई विक्रेते चक्क मिठाईच्या दरात खरड्याचे डब्बे विकत आहे. परंतु वैधमापन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
वरोरा शहर आणि परिसरात अनेक मिठाईची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये सहाशे रुपये प्रति किलो दरापासून तर एक हजार रुपये प्रति किलो दरापर्यंत मिठाई विक्रीला आहे. ग्राहक जेव्हा अशी मिठाई विकत घेण्यासाठी जातात, तेव्हा दुकानदाराने वजन काट्यावर मिठाई ठेवून तिचे वजन केल्यानंतर ती खरड्याच्या डब्यात भरणे अनिवार्य असते. परंतु अनेक दुकानदार तसे न करता चक्क खर्ड्याचा  डब्बाच वजन काट्यावर ठेवतात आणि त्यात मिठाई भरून मागितलेल्या वजना एवढे मिठाईचे डब्यासह वजन मोजून ती ग्राहकाला देतात. खर्ड्याच्या डब्यांचे वजन गृहीत धरले जात नसल्याने अतिशय अल्प दरात मिळणारे खर्ड्याचे डबेच मिठाच्या दराने विकले जात आहे हे स्पष्ट आहे. मिठाई दुकानदार अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करत असताना वैधमापन विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

 
भाजीविक्रेत्यांची वजने तपासण्याची गरज

वरोरा शहरात दररोज भाजी बाजार भरत असतो. यातही रविवारी मुख्य बाजारपेठेत व आनंदवन चौकामध्ये भरणारा बाजार आणि बुधवार रोजी आनंदवन चौकामध्ये भरणारा भाजी बाजार हा ग्राहकांसाठी महत्त्वाचा असतो. या  भाजी बाजारामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असते. याचा गैरफायदा घेऊन भाजीविक्रेते ग्राहकांना वजनाच्या तुलनेत कमी भाजीपाला देत असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडे असलेली वजने ही प्रमाणित नसून अप्रमाणित वजनाच्या माध्यमातून ते ग्राहकांची फसवणूक करीत आहे. डिजिटल वजना द्वारे सुद्धा ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. यामुळे याची दखल वैधमापन विभागाने घेण्याची गरज आहे.

Comments