प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

भद्रावती येथे हुतात्मारक पासून ओबीसी महामोर्चाची भव्य जनजागृती बाईक रॅली!**महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन*

*भद्रावती येथे हुतात्मारक पासून ओबीसी महामोर्चाची भव्य जनजागृती बाईक रॅली!*

*महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन*.

अतुल कोल्हे भद्रावती :- 
                     मराठा समाजाला ओबीसी खोट्यातून आरक्षण देऊ नये, मराठ्यांच्या ओबीसीत झालेला घटनाबाह्य समावेश तात्काळ रद्द करण्यात यावा, जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, मराठा आरक्षणा संबंधित आलेला अध्यादेश रद्द करावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यासाठी दिनांक सात रोज बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे .या महामोर्चा बद्दल ओबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी तसेच या महामोर्चात शहर तथा तालुक्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे याबाबत जनजागृती करण्यासाठी ओबीसी महासंघातर्फे दिनांक 6 रोज मंगळवार ला शहरातील नाग मंदिर चौकात छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे व वंचित आघाडीचे कुशल मेश्राम यांचे शुभ हस्ते मालार्पण करून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. .सदर जनजागृती रॅली शहरातील प्रमुख तथा अंतर्गत रस्त्यांमधून काढण्यात आली  या रॅलीच्या माध्यमातून शहरातील ओबीसी बांधवांना महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले शक्ती प्रदर्शन दाखवावे असे आवाहन करण्यात आले याशिवाय तालुक्यातील ग्रामीण भागातही या महामोर्चात सहभागी होण्यासाठी विविध गावात जाऊन जनजागृती करण्यात आली .सदर बाईक रॅलीत माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, ज्ञानेश्वर डुकरे, खुशल मेश्राम ,पांडुरंग टोंगे, शिवसेना जिल्हाप्रमुख उबाठा जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, आदिवासी नेते रमेश मेश्राम, सुरज गावंडे, सुनील आवारी, सुनील खोब्रागडे ,सुधीर सातपुते, प्रफुल चटकी, लीमेश माणूस मारे ,सुधीर पारधी, सुनील बिपटे ,मनोहर नागपुरे, वासुदेव सातारकर, वसंता उंमरे, वंदना धानोरकर, सुनंदा डुकरे, रेखा कुटेमाटे, कविता सुपी, लक्ष्मी पारखी ,विभा बेहेरे, टोंगे मॅडम, कवडृ मते, सुनील वैद्य, मोरेश्वर आवारी आदींसह हजारोच्या संख्येने ओबीसी महिला तथा बांधव सहभागी झाले होते.

Comments