खूनाच्या आरोपीस ७ वर्षाचा सक्षम कारावास व दंड**खेमजई येथील घटना**आरोपीस आज सुनावली सजा*

* खूनाच्या आरोपीस ७ वर्षाचा सक्षम कारावास व दंड* *खेमजई येथील घटना* *आरोपीस आज सुनावली सजा*  वरोडा : ठेंगडी सर       जमिनीच्या वादातून पुतण्याने काकाचा खून केल्याच्या आरोपावरून पुतण्यास ७ वर्षाचा कारावास व वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज 22 एप्रिल रोज बुधवार ला सुनावली.          घटनेची माहिती वरोडा तालुक्यातील खेमजई येथे कवडू झित्रा दडमल वय 60 वर्ष व यशवंत भाऊराव दडमल वय ३० वर्ष राहत होते. यांच्यात काका पुतण्याचे नाते होते. त्यांचा वडिलोपार्जित जागेवरून नेहमी वाद होत होता. आरोपी हा मृतकाला नेहमी जागेवरून टोमणे मारून,तू माझ्या पत्नीकडे का पाहतोस असे म्हणत सतत धमकी देत होता.       याच कारणावरून 12 एप्रिल 2021 ला सायंकाळी 7:45 च्या सुमारास आरोपी यशवंतने मृतक कवडू हा आपल्या दोन नातवंडासह घरात असतांना त्याचे डोक्यावर लाकडी टेणप्याने वार करून जखमी केले. मृतक जमिनीवर खाली पडला असतानाही त्याच टेणप्याने त्यास मारले असता कवडू दडमल हे मरण पावले.        मृतकाची पत्नी लिलाब...

गारपीटाने जोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान.हातात आलेले पीक गेले.

गारपीटाने जोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान.

हातात आलेले पीक  गेले.

चेतन लुतडे वरोरा

               वरोरा तालुक्यातील बऱ्याच गावांना आलेल्या अचानक गारपिटामुळे तुर ,हरभरा, गहू , ज्वारी ज्वारी या महत्त्वाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 या गारपीट तथा वादळामुळे तालुक्यातील  तुमगाव, उमरी, बोरगाव, कोसरसार, साखरा, चारगाव, बेंबळा, या पट्ट्यातील  रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तहसीलदारांनी तलाठ्यांना शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश द्यावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य नितीन मत्ते, राजू चिकटे  यांनी केली आहे.  
शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज कसे फेडायचे याचा विचार शेतकरी करून राहिला आहे. 
एकीकडे हमीभाव सुद्धा शेतकऱ्यांच्या मालाला मिळालेला नाही यामध्ये पुन्हा गारपिटाने शेतकऱ्यांचे नुकसान केले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून 
येणाऱ्या दिवसात महागाई वाढेल अशी चिन्ह दिसत आहे.

नितीन मत्ते यांनी शेतकऱ्यांची कैफियत ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सहानुभूती पर शेतकऱ्यांविषयी झालेल्या नुकसान भरपाई संबंधात सोमवारला तात्काळ निवेदन सादर केले असून चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Comments