वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

चिचोर्डी शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी**शिवसेने तर्फे आरो भेट : विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी महत्त्वाचे*

*चिचोर्डी शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी*

*शिवसेने तर्फे आरो भेट : विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी महत्त्वाचे*

अतुल कोल्हे भद्रावती :- 
                 शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचोर्डी येथे विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे याकरीता शिवसेना ( उभाठा ) च्या वतीने आरो भेट देण्यात आला. प्राथमिक शाळेत एक ते सात पर्यंत ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्यासाठी शुद्ध पाणी हे महत्त्वाचे असते याकरीता शिवसेना ( उभाठा ) वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचोर्डीला आरो भेट देण्यात आला. यावेळी ठाणेदार बिपिन इंगळे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख महेश जीवतोडे, मुख्याध्यापक नगराळे, मंगेश शिरसागर, मिलिंद कांबळे, महादेव बांगडे आदी उपस्थित होते.

Comments