वामन चटप यांची विदर्भ राज्यासाठी 'स्वतत्र विदर्भ राज्य ' आंदोलनाची हाक.. वरोरा येथे चटप यांची भेट. नागपूर : विदर्भ राज्य निर्मितीसाठी ‘ स्वतत्र विदर्भ राज्य ' अंतर्गत मोठे आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, भाजपने २०१४ मध्ये विदर्भात मते मागूनही शिवसेनेच्या विरोधामुळे राज्य देण्याचे आश्वासन पाळले नाही. यापूर्वी काँग्रेसनेही विविध समित्यांच्या शिफारशी लागू न करता जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या २० वर्षात विदर्भातील ४७ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राज्यातील २ लाख ४७ हजार नोकऱ्यांचा अनुशेष लक्षात घेऊन हे आंदोलन बेरोजगारी व कुपोषण दूर करण्यासाठी आवश्यक असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले. महाराष्ट्र दिवाळखोरीत असून, येथे तरुणांना रोजगार मिळणार नसल्याने लवकरात लवकर विदर्भ राज्य निर्माण व्हावे, अशी मागणी करत आंदोलकांनी खासदारांना राजीनामे देऊन जनसंग्रामात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment