प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

देऊळवाळा गावामध्ये बंदुकीची गोळी आल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण.

देऊळवाळा गावामध्ये बंदुकीची गोळी आल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण.

वरोरा
चेतन लुतडे

भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत देऊळवाडा गावांमध्ये अचानकपणे बंदुकीची गोळी आल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
देऊळवाडा हे गाव विजासन जवळ असून या टेकड्यांमध्ये पोलिसांची फायरिंग नेहमी होत असते. हा त्यांचा कवायतीचा भाग असतो. गेल्या कित्येक वर्षापासून ही कवा आहेत या ठिकाणी केली जाते. परंतु विजासन या टेकडी पासून देऊळवाडा हे गाव दोन ते अडीच किलोमीटरवर आहे. या ठिकाणची गाव वस्ती बरीच मोठी असून या ठिकाणी कच्चे घरे बनलेली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कवायती दरम्यान बंदुकीची गोळी येण्याचा त्रास बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. गावकऱ्यांनी वारंवार तक्रार देऊन सुद्धा या ठिकाणी हा त्रास सुरूच आहे. 
पोलिसांनी बंदूकीची गोळी गावातून हस्तगत केली असून ही गोळी जशीच्या तशीच होती. त्यामुळे ही गोळी नेमकी कुठून आली याचा तपास पोलीस निरीक्षक इंगळे  घेत आहे. 

मात्र हा वारंवारचा प्रकार असून गावामध्ये बंदुकीच्या गोळीने गावकरी दगावल्यास  पोलीस प्रशासन जबाबदार राहतील काय असा अहवाल गावकऱ्यांनी केला आहे.
त्यामुळे देऊळवाडा गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments