खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

देऊळवाळा गावामध्ये बंदुकीची गोळी आल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण.

देऊळवाळा गावामध्ये बंदुकीची गोळी आल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण.

वरोरा
चेतन लुतडे

भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत देऊळवाडा गावांमध्ये अचानकपणे बंदुकीची गोळी आल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
देऊळवाडा हे गाव विजासन जवळ असून या टेकड्यांमध्ये पोलिसांची फायरिंग नेहमी होत असते. हा त्यांचा कवायतीचा भाग असतो. गेल्या कित्येक वर्षापासून ही कवा आहेत या ठिकाणी केली जाते. परंतु विजासन या टेकडी पासून देऊळवाडा हे गाव दोन ते अडीच किलोमीटरवर आहे. या ठिकाणची गाव वस्ती बरीच मोठी असून या ठिकाणी कच्चे घरे बनलेली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कवायती दरम्यान बंदुकीची गोळी येण्याचा त्रास बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. गावकऱ्यांनी वारंवार तक्रार देऊन सुद्धा या ठिकाणी हा त्रास सुरूच आहे. 
पोलिसांनी बंदूकीची गोळी गावातून हस्तगत केली असून ही गोळी जशीच्या तशीच होती. त्यामुळे ही गोळी नेमकी कुठून आली याचा तपास पोलीस निरीक्षक इंगळे  घेत आहे. 

मात्र हा वारंवारचा प्रकार असून गावामध्ये बंदुकीच्या गोळीने गावकरी दगावल्यास  पोलीस प्रशासन जबाबदार राहतील काय असा अहवाल गावकऱ्यांनी केला आहे.
त्यामुळे देऊळवाडा गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments