पुनर्वसन गावातील शेतकऱ्यांना सातबाऱ्याचे वाटप; रानतळोदी गावाचा महसूल दर्जाप्राप्त होण्यात आघाडीवर

  पुनर्वसन गावातील शेतकऱ्यांना सातबाऱ्याचे वाटप; रानतळोदी गावाचा महसूल दर्जाप्राप्त होण्यात आघाडीवर वरोरा (जि. चंद्रपूर) : राज्यातील पुनर्वसन झालेल्या गावांपैकी अवघ्या अडीच वर्षांच्या कालावधीत महसूल दर्जा मिळवून शेतकऱ्यांच्या हाती सातबारा पोहोचविणारे रानतळोदी हे पहिले गाव ठरले आहे. या गावातील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आयोजित विशेष शिबिरात सातबाऱ्याचे वितरण करण्यात आले. स्व. बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील मुख्यमंत्री हॉलमध्ये दिनांक १४ मार्च रोजी हे शिबिर पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, तहसीलदार श्री. कोटकर, आनंदवनच्या महारोगी सेवा समितीचे श्री. कडू गुरुजी, जिल्हा शांतता समितीचे सदस्य तथा वरोराचे माजी सभापती शेख जैरुदीन छोटूभाई, उपविभागीय अधिकारी श्री. गुळाणे, नायब तहसीलदार श्री. बर्डे व भूमी अभिलेखाचे श्री. पवार उपस्थित होते. या मान्यवरांच्या शुभहस्ते रानतळोदी येथील शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण करण्यात आले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, तलाठी...

बँक अधिकारी असल्याचा बनाव करून महिलेला लुटणाऱ्या आरोपींना अटक ,चंद्रपूर गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी

बँक अधिकारी असल्याचा बनाव करून महिलेला लुटणाऱ्या आरोपींना अटक 

चंद्रपूर गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी

वरोरा:  तालुक्यातील येंसा गावातील महिलेची स्वतःला बँकेचे अधिकारी सांगुन पंतप्रधान किसान योजनेमार्फत पैसे मंजूर झाले असल्याची बतावनी करीत सोमवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सकाळच्या  तब्बल ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली . याबाबत महिलेने फिर्याद देताच चंद्रपुर गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवून दोन्ही आरोपीला २४ तासाच्या आत अटक करण्यात यश  मिळविले.
 वरोरा तालुक्यातील  येंसा येथील मंजुळाबाई नथुजी झाडे ६५ वर्ष या महिलेला दोन अज्ञात  इसमांनी स्वतःला बँकेचे अधिकारी असल्याचा बनाव करून पंतप्रधान किसान योजनेमार्फत १ लाख ४० हजार व बैलबंडी साठी ३ लाख रुपये मंजूर झाले असल्याचे सांगितले. परंतु त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी २२ हजार रुपये रोख भरावे लागतील असे म्हटले होते. महिलेने एवढी रक्कम स्वतःकडे नसल्याचे सांगताच त्यांनी महिलेकडून सोन्याची पोत व कानातील बिऱ्या असा एकूण ३८ हजार रुपयांचा ऐवज घेवून पळ काढला.
दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्या महिलेने वरोरा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दिली.

दीक्षांत समारंभ

Comments