प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

किशोर टोंगे यांचे शिष्टमंडळ सोयाबीन घेऊन उपविभागीय कार्यलयात धडकले

किशोर टोंगे यांचे शिष्टमंडळ सोयाबीन घेऊन उपविभागीय कार्यलयात धडकले
वरोरा :-
  वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवा नेते किशोर टोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिष्टमंडळ आज सोयाबीन घेऊन उपविभागीय कार्यालयात धडकले.

वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन या पिकावर आलेल्या रोगामुळे पीक हे पूर्णता पिवळे पडून वाळायला लागले आहे. सोयाबीच्या ३३५ या जड वाणाचे सोयाबीन हे १००% खराब होऊन ते नापीक झाले आहे. ९३०५ हलके वाण असून ते ८० ना पीक झाले आहे. मागील चार पाच वर्षापासून कापूस या पिकाला बोन्डअळी चा प्रादुर्भाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी या वर्षी सोयाबीन पिकांची लागवड मोठया प्रमाणात केली असून सोयाबीन चे चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती परंतु अति पावसामुळे अनेक प्रकारचे रोग सोयाबीन वर येऊ लागले आणि  सोयाबीन हे पीक होतेचे नव्हते करून गेले त्यामुळे शेतकरी हा चिंतेत असून तो प्रशासनाची मदत मिळेल या आशेवर आहे.
यासाठी किशोर टोंगे यांच्या शिष्ट मंडळाने शासनाने प्रति एकरी तात्काळ ५१ हजार रुपये अशी मदत जाहीर करावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या मार्फत निवेदन देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

यावेळी शिष्ट मंडळात युवा कार्यकर्ता शुभम आमने, बंडू वरारकर, शुभम पिजदूरकर, साहिल मोडक, प्रवीण बदखल, यश आवारी, विजय चिकटे,कौशल कुमरे, वृषीकेश धानोरकर, मयूर पिजदुरकर,आकाश तुरारे, इ. उपस्थित होते.




Comments