चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वसुमना पंत .

चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेल्या   पहिल्या महिला जिल्हाधिकारी  वसुमना पंत . बातमी: चेतन लूतडे २/४/२६ चंद्रपूर दि. २ – महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या फेरबदल केले आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. (भाप्रसे) यांची छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या जागी राहणार असून, स्वामी यांना कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करण्यात आले आहे. त्याचबरोबर, विनय गौडा यांच्या जागी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार, विनय गौडा यांनी तातडीने छत्रपती संभाजीनगरचा कार्यभार दिलीप स्वामी यांच्याकडून स्वीकारावा, तर चंद्रपूरचा कार्यभार वसुमना पंत यांच्याकडे सोपवावा. बदली झाल्यानंतर कार्यभार हस्तांतरणाबाबतच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशाला सह सचिव सुभाष उमराणीकर यांनी मंजुरी दिली आहे. वसुमना पंत यांनी यापूर्वी विविध महत्त्वाच्या पदांवर काम क...

सरकार मधील पक्षाने मोर्चा काढण्यापेक्षा मदत मिळवून द्यावी*किशोर टोंगे यांचा भाजपावर हल्लाबोल

सरकार मधील पक्षाने मोर्चा काढण्यापेक्षा मदत मिळवून द्यावी*

किशोर टोंगे यांचा भाजपावर हल्लाबोल 

वरोरा:
वरोरा भद्रावती तालुक्यातील सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले असून सोयाबीनचे पीक नष्ट होत आहे. या अनुषंगाने सरकारचे लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टीने भाजपातील काही नेत्यांनी मोर्चा काढल्याने किशोर टोंगे यांनी निशाणा साधला.

सोयाबीनच हातातोंडांशी आलेलं पीक नष्ट होताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत तर दुसरीकडे सत्तेतील लोक मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याऐवजी राजकीय आंदोलन करत आहेत.

आज राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे असून शेतकऱ्यांना त्यांच्याच नेतृत्वात रस्तावर उतरावे लागत आहे ही लाजिरवाणी बाब आहे असंही ते म्हणाले.

जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे असून ते अजूनही इकडे फिरकले नाहीत, आमच्या शेतकरी बांधवांचं दुःख समजून घेतलं नाही. त्यांना बांधावर आणण्याऐवजी हे आंदोलन करण्यात मशगुल आहेत यावरून यांची शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी समजते अशी टीका त्यांनी केली.

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी स्वतः, जिल्हाधिकारी व महसूल आणि कृषि यंत्रणेसह तातडीने पाहणी करून अहवाल तयार करावा आणि आपलं वजन वापरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा व हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली.

याविषयी तातडीने कार्यवाही न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन उभे करू यावेळी शेतकरी बांधवांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल असंही ते म्हणाले.

Comments