प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

पोळा सणानिमित्त सुट्टी नसल्याने शेतकरी नाराज.नितीन मत्ते यांचा आक्षेप*

पोळा सणानिमित्त सुट्टी नसल्याने शेतकरी नाराज.
नितीन मत्ते यांचा आक्षेप* 

वरोरा १४/९/२३
चेतन लूतडे वरोरा

चंद्रपूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग असून सणाच्या वेळेस सुट्टी दिल्या जाते. या दिवशी शेतकरी  परंपरेने शेतीमधील कामे बंद ठेवून बैलाची सेवा घरी करीत असतो. यासाठी सकाळपासूनच बैलांना मोठ्या प्रमाणात सजवले जाते. बैलांच्या आवडीचे खाद्य सुद्धा देण्यात येते. शेतकरी आपल्या बैल जोडीला सजवून  घरोघरी जाऊन त्यांचे पूजन करून आणतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण दिवाळी एवढाच महत्त्वाचा असतो.
मात्र या दिवशी सुट्टी नसल्याने शेतकरी नाराज असून लहान लहान सणाला सुट्टी दिल्या जाते मात्र शेतकऱ्यांच्या सणाला सुट्टी का  दिली जात नाही.?असा आक्षेप शेतकरी नेते शिवसेना   जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी आक्षेप दर्शविला आहे. यासंदर्भात वरिष्ठांना विचारणा केली असता.  वरिष्ठांना हा सण महत्त्वाचा वाटला नाही. 
त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकारी किती महत्त्व देते हे कळते. अशी प्रतिक्रिया मत्ते यांनी नोंदवली.




Comments