कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हातमाणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हात माणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ बातमी: चंद्रपूर : सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर तर्फे कॅन्सरशी झुंज देणाऱ्या १० वर्षीय कुमारी रोही सिंह हिला मदतीचा हात देण्यात आला आहे. ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत ही मदत करण्यात आली असून, तिच्या उपचारांसाठी महत्त्वाचे सहकार्य मिळाले आहे. मुळचे उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील नागेंद्र सिंह हे सध्या नागपूर येथे उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहेत. त्यांची अल्पवयीन मुलगी रोही सिंह हिला हाडांचा कॅन्सर (Bone Cancer) झाला असून, या गंभीर आजारामुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अशा कठीण परिस्थितीत ट्रस्टने पुढाकार घेत तिच्या उपचारांसाठी आर्थिक तसेच नैतिक आधार दिला आहे. या उपक्रमातून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर एका निरागस मुलीला नव्याने जगण्याची आशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रोही ही या आजारावर मात करून पुन्हा आनंदाने जीवन...

चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन*अज्ञात रोगाने सोयाबीनचे हातात आलेले पीक करपले.*सरकारने एकरी 40 हजार रुपये अनुदान सरसकट द्यावे.

शेतकऱ्यांचे कैवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते

अज्ञात रोगाने सोयाबीनचे हातात आलेले पीक करपले.

सरकारने एकरी 40 हजार रुपये अनुदान सरसकट द्यावे.

वरोरा

चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हातात आले असताना अचानक अज्ञात रोगाने सोयाबीन या पिकाला पूर्णता नष्ट केले आहे. मोजाक आणि खोड अळी किंवा पांढरी माशी यांच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झाले असून जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहे. कृषी विभागाकडून या रोगाविषयी अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नेते शेतकऱ्याच्या पाठीशी असून यासाठी निवेदन व मोर्चा काढत आहे. 

चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तहसीलदारांना निवेदन सादर केले. शेतकऱ्यांचे कैवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी यावेळी  एक रुपयात विमा काढला होता. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ देण्यात यावा. किंवा ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नसेल त्यासाठी सरकारने सरसकट एकरी चाळीस हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठी नक्की अनुदान देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी , शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments