वरोरा येथील व्यापाऱ्यांचा रस्ता बंद ; रस्ता मोकळा करून देण्यासाठी नगरपालिकेला निवेदन.मुत्रीघराचा प्रश्न अजूनही प्रलंबित.

वरोरा येथील व्यापाऱ्यांचा रस्ता  बंद ; रस्ता मोकळा करून देण्यासाठी नगरपालिकेला निवेदन. मुत्रीघराचा प्रश्न अजूनही प्रलंबित. वरोरा (जि. चंद्रपूर) – येथील संभुनाथ वरधने यांनी जाण्यायेण्याचा मुख्य रस्ता बेकायदेशीररित्या टीन वेल्डिंग करून बंद केल्याने स्थानिक व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोकनाथ जयस्वाल (मालिक डी आर जयस्वाल लिकर शॉप) व समस्त व्यापाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. अर्जानुसार, गेल्या ३० ते ४० वर्षांपासून हा १०-१२ फूट रस्ता पायवाट व मोटरसायकलसाठी वापरात होता. दिनांक ०४/०४/२०२६ रोजी कोणालाही न विचारता वरधने यांनी हा रस्तावर टीनाचे वेल्डिंग करून बंद केला. यामुळे व्यापारावर त्याचा परिणाम झाला आहे.  अर्जात  संतोष सेलुकर व कैलास तडसे तसेच अन्य व्यापाऱ्यांचा  पाठिंबा आहे. प्रशासनाने या प्रकरणी लवकरात लवकर पंचनामा करून रस्ता मोकळा करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.  या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून देशी विदेशी दारूचे दुकान असल्याने मोठ्या प्रमाणात आंबट शौकीन या ठिकाणी दारू पिल्यानंतर या रोडवरच...

चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन*अज्ञात रोगाने सोयाबीनचे हातात आलेले पीक करपले.*सरकारने एकरी 40 हजार रुपये अनुदान सरसकट द्यावे.

शेतकऱ्यांचे कैवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते

अज्ञात रोगाने सोयाबीनचे हातात आलेले पीक करपले.

सरकारने एकरी 40 हजार रुपये अनुदान सरसकट द्यावे.

वरोरा

चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हातात आले असताना अचानक अज्ञात रोगाने सोयाबीन या पिकाला पूर्णता नष्ट केले आहे. मोजाक आणि खोड अळी किंवा पांढरी माशी यांच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झाले असून जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहे. कृषी विभागाकडून या रोगाविषयी अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नेते शेतकऱ्याच्या पाठीशी असून यासाठी निवेदन व मोर्चा काढत आहे. 

चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तहसीलदारांना निवेदन सादर केले. शेतकऱ्यांचे कैवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी यावेळी  एक रुपयात विमा काढला होता. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ देण्यात यावा. किंवा ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नसेल त्यासाठी सरकारने सरसकट एकरी चाळीस हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठी नक्की अनुदान देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी , शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments