प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

जिल्हा परिषद ने टाकलेले भोंगे गेले वाहून..

जिल्हा परिषदेच्नेया बांधकाम विभागाचे टाकलेले भोंगे गेले वाहून..

पाऊस आला मोठा, फुल झाला छोटा

पूलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज

वरोरा
किशोर डुकरे, आसाळा

जिल्हा परिषद मार्फत गाव पांदण रस्ते गावातील नाल्या तसेच अनेक प्रकारचे कामे जिल्हा परिषद बांधकाम  विभागामार्फत केल्या जाते मात्र  कुठलेच अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येते . बांधकामाचे दोष निवारण कालावधी एक वर्ष ते दोन वर्ष पर्यंत सदर ठेकेदार वरिष्ठ अधिकाऱ्याचे संबंध जपून निकृष्ट दर्जाचे बांधकाम लपवल्या जाते. याकडे वैयक्तिक संबंधामुळे अधिकारी सुद्धा कधीकधी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.या अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य जनतेला नाहकत्रास सहन करावा लागत आहे.
 याचे उदाहरण म्हणून बोरगाव  (दे )ते आसाळा या मार्गावर काही वर्षा अगोदर बांधकाम ठेकेदारा मार्फत करण्यात आले होते. मात्र हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने बांधलेला पुल पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला.  यामुळे आजूबाजूच्या शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याला सर्वस्वी जबाबदार बांधकाम विभागच असून शेतीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
फुल इतका निकृष्ट दर्जाचा होता की त्यामध्ये टाकलेले भोंगे सुद्धा वाहून गेले तरी मात्र बांधकाम विभागाला अजून पर्यंत जाग आली नाही. याच पद्धतीने रोडची सुद्धा दुरावस्था झालेली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
  संबंधित पुलाचे लवकरात लवकर बांधकाम करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे तसेच परिसरातील शेतकरी व इतर नागरिक करीत आहे.

Comments