वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

वरोरा येथे आदिवासी समाजाचा जनआक्रोश मोर्चा

वरोरा येथे आदिवासी समाजाचा जनआक्रोश मोर्चा 

वरोरा
चेतन लूतडे

मणिपूर येथे आदिवासी समाजाच्या महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात वरोरा येथील आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयापर्यत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

रमेश मेश्राम यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी गजानन मेश्राम यांच्या सोबत शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते. मणिपूर मध्ये झालेल्या घटनेनंतर भारतातील अनेक राज्यांमध्ये आदिवासी बांधव जन आक्रोश मोर्चा करीत असून मणिपूर सरकार व केंद्र सरकारचा निषेध नोंदवत आहे. वरोरा येथील आदिवासी समाजाने या घटनेविषयी राष्ट्रपतीला निवेदन सादर केले असून या घटनेमध्ये दोषी असणाऱ्या आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे.
यावेळी तहसील कार्यालयात शेकडो आदिवासी बांधवांनी उपविभागीय कार्यालयात आपले निवेदन सादर केले. व केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
मणिपूर मधील कांगपोकपी जिल्ह्यात चार मे रोजी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची दिंड काढण्याचा अमानुष प्रकार घडला होता. या प्रकरणात सहभागी असलेल्या 14 आरोपींची पोलिसांनी ओळख पाठवली आहे. या प्रकरणात सहा आरोपींची तुरुंगात रवांगी सुद्धा करण्यात आली आहे. याच प्रकरणातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एक महिला भारतीय लष्करातील माजी जवानाची पत्नी आहे. यासंदर्भात 21 जून रोजी सैकुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.


जाहिरात

Comments