प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

वंधली सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी परिवर्तन पॅनल चा दणदणीत विजय

वंधली सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी परिवर्तन पॅनल चा दणदणीत विजय 

वरोरा तालुका प्रतिनिधि -
वरोरा तालुक्यातील वंधली येथील सेवा सहकारी संस्थेची नुकतीच निवडणूक पार पडली  असून या निवडणुकीमध्ये शेतकरी सहकार  परिवर्तन पॅनलचा दननीत विजय झाला आहे. एकूण बारा उमेदवारांपैकी  दहा उमेदवार परिवर्तन पॅनल चे विविध  जागेवर  निवडून आले. 
 निवडून आलेल्या संचालकामध्ये विठ्ठल उर्फ बाळू त्र्यंबकराव भोयर, शेखर मोरेश्वरराव चौधरी,अनिल रामचंद्र महल्ले, किशोर पांडुरंग टापरे , धनराज लक्ष्मण चौधरी, कवडू विठूजी पिसाळकर व किशोर पांडुरंग टापरे हे सर्वसाधारण शेतकरी प्रतिनिधी गटातून  आठ पैकी सात संचालक परिवर्तन पॅनल चे निवडून आले  असून अनुसूचित जाती जमाती गटामधून विठ्ठल शंकर घोडमारे ,महिला राखीव गटातून दर्शना चंद्रकांत धोटे व इतर मागासवर्गीय गटात संकेत संजय भोयर हे तीन उमेदवार असे  एकूण दहा उमेदवार परिवर्तन पॅनलचे चांगल्या मतांनी विजयी झाले .विशेष मागासवर्गीय गटातून अविरोध निवडून आलेले  गजानन पुंडलिक झीले यांनी देखील शेतकरी परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिलाअसून शेतकरी परिवर्तन पॅनलचे  असे एकूण 11 उमेदवार विजयी झाले आहेत.
   सहकार परीवर्तन पॅनलचे नेतृत्व खरेदी-विक्रीचे संचालक व बाजार समितीचे माजी बांधकाम समिती सभापती बाळूभाऊ भोयर व  माजी सरपंच  तात्यासाहेब चौधरी यांनी केले असून या संस्थेवर अनेक वर्षापासून  काँग्रेस  प्रणित नेत्यांचे  वर्चस्व होते मात्र यावेळी वर्चस्व संपुष्टात आले आहे.
 परिवर्तन पॅनल छा विजय झाला झाल्याने गावात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
   दुसरे उभे असलेले शेतकरी विकास पॅनल चे नेतृत्व माजी अध्यक्ष प्रविण भोयर व तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर यांनी केले असून  शेतकरी विकास पॅनल चे प्रवीण भोयर  हे शेतकरी सर्वसाधारण प्रतिनिधी गटातून  तर महिला राखीव गटातून  अंजू प्रवीण भोयर असे दोनच उमेदवार निवडून आले. निवडणुक अधिकारी म्हणून येवले यांनी काम सांभाळले.

Comments