वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण. श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार

वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण.  श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार वरोरा/ चेतन लूतडे/२९/३/२६  श्री खाटूश्याम बाबांच्या असीम कृपेने वरोरा नगरीत ‘भव्य श्याम भजन संध्या’ अत्यंत उत्साहात व भव्य दिव्य रोषणाईत, मंगलमय वातावरणात द्वारकाधीश लाॅन  येथे संपन्न झाली. या वेळी श्री खाटू श्यामजींच्या भक्तीने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. प्रसिद्ध भजन गायक श्री. सागरजी व्यास (हैदराबाद) व निधी मंत्री नागपूर यांच्या सुमधुर आवाजातील भजनांनी भाविकांच्या मनाला एक वेगळीच शांती व प्रसन्नता दिली. फुलांची वर्षा, अखंड ज्योत, अत्तराचा वर्षाव आणि बाबांचा अलौकिक दरबार पाहून भक्तीचा महासागर लोटल्याचा अनुभव वरोरा शहरातील भाविकांना आला. या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य वरोरा वाशीयांना लाभले, त्याबद्दल श्यामबाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. व वरोरा शहरात बाबाचे मंदिर बनविण्याचा मानस डॉक्टर सागर वजे यांनी व्यक्त केला आहे. "करने वाला श्माम करन वाला श्माम" कार्यक्रमांमध्ये ...

विदर्भ स्तरीय "स्मृतिगंध" काव्य संमेलन गुंडावार सभागृहात संपन्न

विदर्भ स्तरीय "स्मृतिगंध" काव्य संमेलन  गुंडावार सभागृहात संपन्न 

वरोरा
दिपक शिव

स्व.विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान ,भद्रावती आयोजित विदर्भ स्तरीय 
"स्मृतिगंध" काव्य संमेलन,दि.१९/३/२०२३ ला श्री.गुंडावार सभागृहात संपन्न झाले."खुले कविसंमेलन" या सत्रात कविसंमेलनाध्यक्ष पद स्वीकारताना प्रत्येकच कविता लक्ष पूर्वक ऎकून तिला न्याय देण्याची फार मोठी जबाबदारी सांभाळावी लागली .ते समाधान अनुभवताना निश्चितपणे आनंद होतो.या कविसंमेलनात जवळ जवळ ३२ कवींनी सहभाग नोंदविला एका पेक्षा एक नवीन विषयांवरील कविता सादर झाल्यात त्यात चि.भूपेश या बाल कवीने "सॆनिक जन्म घेतील भारतात" ही देशप्रेम दर्शवणारी कविता सुरुवातीलाच सादर केली.खंत,कवितेच्या काठावर-हरितक्रांती,उंदीर,
बाप,लोकशाहीतील पत्रकारिता,घर,स्त्री,सवय,
 शिर्षक असलेल्या कवितांसोबतच, श्री.उसेवारांनी ,मार्मिक पण मिष्किल कविता सादर केलीत,पेंशन,माणसे वाचन, श्री.जितेश कायरकरची "तरुणी " ही कविता, श्रीमती दिव्या यांची "शक्ति की नारी" ही कविता तृप्तीचा ,सुखद अनुभव देऊन गेल्या ,वणव्यातील माती,अभंग आणि ५ गझल वाचल्या गेल्या त्या हृदयावरती अधिराज्य गाजवून गेल्या ,श्री.रितेश पराते यांची "प्रश्नांची गर्दी" ही कविता अनेक उत्तरे देऊन गेली.

 तर "मला पेटवायची आहे होळी" ही कविता नफरत आणि उद्वेग यांने व्यापलेली होती,भक्ती रस ओतलेले काही अभंग, पळस, सुक्ष्म देहातील माणूस,श्री.तराळे अतिशय वृध्द व्यक्तिमत्व यांनी "मद्यपान" या विषयावरची कुटूबं चा होणारा -हास या वर अभिव्यक्त झाले.शेतक-यांचे अश्रृ दर्शविणा-या शेवटच्या दोन कविता अस्वस्थ करुन गेल्या, "माणसा मधला माणूस" एक कोड सांगून जाणारी कविता...या  कविता ऎकताना कवितेचा दर्जा उंचावतो आहे हे नमूद करावेसे वाटते.सर्व कवींचे मनःपूर्वक अभिनंदन,उत्तम सहज सुंदर सूत्रसंचालन करणा-या श्रीमती आरती रोडे यांचे कॊतूक करायला हवे,आयोजक मा.श्री.प्रविणजी आडेकर आणि सहकारी यांचे मनापासून आभार यथोचित्त सन्मान केला.

Comments