वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

पिजदुरा गावातील लाभार्थी शेतकरी शेतमजूर खावटी रकमेपासून वंचित**पशुसंवर्धन विस्तार अधिकारी नेवारे यांचे शेतकरी शेतमजूर याना आश्वासन*

*पिजदुरा गावातील लाभार्थी शेतकरी शेतमजूर खावटी रकमेपासून वंचित*

*पशुसंवर्धन विस्तार अधिकारी नेवारे यांचे शेतकरी शेतमजूर याना आश्वासन*

वरोरा : महाराष्ट्र शासनाच्या पशु जनावरे वाटप योजने अंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडून गावातील शेतकरी, शेतमजूर यांना पशु  जनावरे वाटप केल्या जाते तसेच पशु वाटप केल्यानंतर जनावरांना लागणारे खाद्याकरिता खावटी म्हणून शासन खाद्याची रक्कम शेतकरी शेतमजूर यांचा बँक खात्यात जमा करत असते.वरोरा तालुक्यातील पिजदुरा गावातील असे लाभार्थी शेतकरी शेतमजूर यांच्या खात्यात दोन महिन्यापासून शासनाने खावटीची रक्कम जमा केली नाही. पिजदुरा गावातील लाभार्थी शेतकरी शेतमजूर वारंवार संबंधित विभागाला विचारणा करूनसुद्धा प्रश्न सुटत नसल्याने  लाभार्थी शेतकरी  शेतमजूर यांनी दि. 9 ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरकर यांची तात्काळ भेट घेऊन समस्यांचे निवारण करण्याची विनंती केली .

शेतकरी शेतमजूर यांच्या प्रकरणाची दाखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांचा मार्गदर्शनात तालुका प्रमुख दत्ता बोरकर यांच्या नेतृत्वामध्ये उपतालुकाप्रमुख टेमुर्डा-चिकणी क्षेत्र गजानन गोवरदिपे, अशोकभाऊ गेडाम, युवा सेनेचे निखिल मांडवकर, उज्वल काळे, सुरज चांदेकर व पिजदुरा गावातील पीडित शेतकरी शेतमजूर सुखदेव आत्राम, रामकृष्ण श्रीरामे, सुधाकर मडावी, दशरथ चौधरी, सुरेश चांदेकर, पांडुरंग आत्राम, विनोद आत्राम, रामभाऊ रंदई, संतोष दडमल यांनी पशुसंवर्धन विस्तार अधिकारी नेवारे यांची भेट घेवून निवेदन दिले व समस्याबाबत चर्चा केली. 
पशुसंवर्धन विस्तार अधिकारी नेवारे यांनी लवकरात लवकर समस्या मार्गी काढण्याचे आश्वासन दिले. 
पिजदुरा गावातील पीडित शेतकरी शेतमजूर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे,  तालुका प्रमुख दत्ता बोरकर तसेच ईतर पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केलेत.

Comments