नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर

नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन;  दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर   वरोरा, दि. १८ मार्च – शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसह दिव्यांग नागरिकांचा ५ टक्के निधी थकविल्याप्रकरणी जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुदीन (छोटूभाई) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर परिषद कार्यालयात आयोजित बैठकीत शेख जैरुदीन यांनी सांगितले की, शहरातील हजारो नागरिक कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.   दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये उपभोक्ता कर भरूनही दर दोन दिवसांनी घंटागाडी येत असल्याने घरात कचरा साचतो. दररोज घंटागाडी पाठवावी अन्यथा कर अर्धा करावा.  अनेक महिन्यांपासून फवारणी न झाल्याने मच्छर व विषारी जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. महिन्यातून दोन वेळा फवारणी करण्याची मागणी केली आहे. शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतला असून त्वरित  कारवाई करावी. उन्हाळ...

भद्रावती तालुका व शहर मध्ये स्वस्त धान्य दुकानात अतिरिक्त धान्यसाठा तत्काळ उपलद्ध करा - आशिष ठेंगणे*

भद्रावती तालुका व शहर मध्ये स्वस्त धान्य दुकानात अतिरिक्त धान्यसाठा तत्काळ उपलद्ध करा - आशिष ठेंगणे*

किरण पांडव पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांचे सुचनेनुसार व मा नितीन मत्ते जिल्हाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना चंद्रपूर यांचे कूशल मार्गदर्शनाखाली श्री आशिष ठेंगणे जिल्हाप्रसिधी प्रमुख चंद्रपूर तथा शहरप्रमुख भद्रावती यांचे नेतृत्वात मा . तहसिलदार भद्रावती यांना भद्रावती तालुका ग्रामीण व शहर मध्ये नविन राशनकार्ड धारकांना अतिरिक्त धान्य साठा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले तालुका व शहरातील गरजू नागरिकांना उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक अडचनी निर्माण होत आहे महाराष्ट्र शासनाच्या मोफत धान्यवाटप योजनेचा सुरळीतपणे कारभार सुरु असताना भद्रावती तालुका ग्रामीण व शहर मध्ये या योजनेबाबत अनियमितता दिसून येत आहे . राशनकार्ड धारकांना शासनाकडून होणाऱ्या धान्य पुरवठा अभावी धान्य मिळत नाही अश्या नागरिकांच्या तक्रारी  आशिष ठेंगणे शहरप्रमुख भद्रावती यांना प्राप्त झाल्या व नागरिकांचा शासनाविषयी नाहक असंतोष होत आहे सदर योजने पासून अनेक गरजू नागरिकांना वंचित रहावे लागत आहे यामध्ये शेतमजूर, कामगार, वृद्ध, विधवा, अपंग, व अतिशय गरिब असे नागरिक समाविष्ठ आहे आपण तत्काळ शासनाकडे मागणी करून स्वस्त धान्य दुकानात धान्यसाठा उपलब्ध करून द्यावा ज्यामुळे कुठलाही नागरिक शासनाच्या योजनेपासून वंचीत रहाणार नाही अशा आशयाचे निवेदन आशिष ठेंगणे शहर प्रमुख भद्रावती यांचे नेतृत्वात मा तहसिलदार भद्रावती यांना देण्यात आले याची तत्काळ दखल घेवून मा तहसिलदार यांनी शासनाकडे पाठपुरावा करून तत्काळ साठा उपलद्ध करून देवू व कुणीही शासनाच्या योजनेपासून वंचित रहाणार नाही याची काळीजी घेवू आम्ही मा . जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर यांचेकडे अतिरिक्त साठा उपलब्द करण्याविषयी मागणी केली आहे असे यावेळी आम्हाला लेखी कळविले आहे यावेळी सौ . कल्पना भुसारी उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी, सौ ज्योती लांडगे तालूका प्रमुख सौ अनिता काकडे सौ उशा उमाटे श्री रामचंद्र ढोके श्री अॅड. विशाल भोयर श्री संतोष झोडे श्री चेतन घोरपडे सुनिल पढाल श्री महादेव ठवसे सेजल लेडांगे संजय पारखी शिवम पारखी उपस्थित होते

Comments