‘पुढे कसे होईल?’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला रवींद्र शिंदे यांचे अध्यक्षपद

‘ पुढे कसे होईल?’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला रवींद्र शिंदे यांचे अध्यक्षपद बातमी: चंद्रपूर ५/४/२०२६ चंद्रपूर येथील मा. सा. कन्नमवार सभागृहात ‘पुढे कसे होईल?’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान व स्तंभ पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी अध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभवली. सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ शेतकरी नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी प्रसिद्ध समीक्षक डॉ. नरेंद्र आरेकर यांनी संग्रहातील कवितांवर अभ्यासपूर्ण भाष्य केले. प्रा. डॉ. राजकुमार मुसने, प्रा. डॉ. ज्योत्स्ना मोहितकर व किशोर मुघल या दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीने सोहळा संपन्न झाला. कवी शंकर लोडे यांच्या लेखणीतून उतरलेला हा काव्यसंग्रह समाजातील विविध पैलूंवर मार्मिक भाष्य करणारा असल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या सत्रातील कविसंमेलनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अशा साहित्यिक उपक्रमांमुळे विचारांची देवाणघेवाण होऊन समाजाला नवी दिशा मिळते,...

आरोग्याच्या लाभ मिळण्यासाठी शिबीराचे उत्तम माध्यम**खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन*

*आरोग्याच्या लाभ मिळण्यासाठी शिबीराचे उत्तम माध्यम*


*खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन*

चंद्रपूर : समाजातील शेवटच्या वर्गापर्यंत आरोग्याच्या सोइ, सुविधा पोहचण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. समाजातील प्रत्येक माणसाला आरोग्याच्या लाभ मिळण्यासाठी  शिबीराचे उत्तम माध्यम असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले. 
आज आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरोरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने खांबाडा येथे सेवा सप्ताह व आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटन प्रसंगी खासदार बाळू धानोरकर बोलत होते. 

यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, डॉ. मुजनकर, सरपंच प्रकाश शेळकी, डॉ. शालिक झाडे, पोलीस पाटील शेळकी, रत्नाताई अहिरकर, विलास गावंडे, गणेश मडावी, संजय बोबडे, पद्माकर कडूकर, डॉ. रोहन, सुनील गेडाम, चौधरी, नलिनी धोटे, अविनाश बन, प्रकाश कडुकर, अनिरुद्ध देठे, सुरज बावणे, दिवाकर निखाडे यांची उपस्थिती होती.      

त्यासोबतच विविध आजार, आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करणे, पात्र नागरिकांना जागरूकता निर्माण करणे, पात्र नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड देणे, संसर्गजन्य व असर्गजन्य आजारांची माहिती व उपाययोजना इत्यादी कार्यक्रम या मेळाव्याच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. 

खांबाडा येथे ग्रामीण रुग्णालय, वरोरा यांनी आरोग्य शिबिरात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषोधोपचार केला. उदघाटन प्रसंगी आयोजित आरोग्य शिबिराला परिसरातील ग्रामस्थांनी मोठी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून निदान करून घेतले.

Comments