वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

डॉक्टर विकास आमटे यांचा वाढदिवसानिमित्त मित्र मेळाव्याचे आयोजन

डॉक्टर विकास आमटे यांचा वाढदिवसानिमित्त मित्र मेळाव्याचे आयोजन 

वरोरा
चेतन लूतडे

कोरोना प्रादुर्भावामुळे बऱ्याच दिवसापासून आनंदवन ओसाड पडले होते. मात्र आता आनंदवन मित्रपरिवार व त्यांच्या चाहत्यांनी आनंदवन प्रेमी मित्रांसाठी मित्र मेळावा आयोजन 8 तारखेला करण्याचे ठरवल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉक्टर विकास आमटे यांनी नुकतेच 75 वर्ष पूर्ण केल्याने आनंदवन मित्र परिवारातर्फे अमृत महोत्सव येत्या 8 तारखेला साजरा करण्यात येत आहे. यावेळी डॉक्टर तात्या लहाने, सरन्यायाधीश  शिरपूरकर , यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहे. 

आठ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सकाळी वृक्षारोपण करून सुरुवात केली जाणार असून डॉक्टर विकास आमटे यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने स्वरानंद आर्केस्ट्रा नंतर संध्याकाळी  गजल गायक भिमराव पाचाळे यांचा गजल कार्यक्रम सुद्धा आनंदवन परिसरात आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आनंदवन मित्र परिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या मेळाव्यासाठी शकील पटेल, अजय स्वामी, डॉक्टर अशोक बेलकूडे, दगडू लोमटे  यांनी वरोरा येथे पत्र परिषद घेऊन आनंदवन प्रेमी मित्रांसाठी  या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.

Comments