बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल

बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल बातमी:30/4/2026 वरोरा : तालुक्यातील बांद्रा येथे अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १,०८० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल रोजी पोलिस पथक पेट्रोलिंगदरम्यान असताना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, बांद्रा येथील सुरज उमेश दोहतरे हा आपल्या घरी अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करीत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह संबंधित ठिकाणी धाड टाकली. कारवाईदरम्यान सुरज दोहतरे घरी नसल्याने त्याची पत्नी वनिता सुरज दोहतरे (वय २७) हिची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी पंचासमक्ष घरझडती घेतली असता स्वयंपाकघरातील भांड्याखाली कापडी पिशवीत ९० एम.एल.च्या ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या २७ बाटल्या देशी दारू आढळून आल्या. सदर दारूबाबत कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. नमुना म्हणून एका बाटलीला सील करून रासायनिक विश्लेषणासा...

विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील  राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. 02 ऑक्टोबर, 2022 रोज रविवारला राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती महाविद्यालयातील श्री अरविंद सभागृहात  साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. मंचावर प्रा. डॉ. राजेश सूर (आर. डी. कॉलेज, आल्लापल्ली) सांस्कृतिक विभागप्रमुख  डॉ. बंडु जांभूळकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. ‌उत्तम घोसरे उपस्थित होते. यावेळी  डॉ. सूर यांनी उपस्थित विद्यार्थ्यासोबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.उमाटे यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री  यांच्या  कार्याचा आदर्श समोर ठेवून जीवनात वाटचाल करावी असा मौलिक संदेश दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जांभूळकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमोल ठाकरे तर आभारप्रदर्शन डॉ. उत्तम घोसरे यांनी केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments