वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील  राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. 02 ऑक्टोबर, 2022 रोज रविवारला राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती महाविद्यालयातील श्री अरविंद सभागृहात  साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. मंचावर प्रा. डॉ. राजेश सूर (आर. डी. कॉलेज, आल्लापल्ली) सांस्कृतिक विभागप्रमुख  डॉ. बंडु जांभूळकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. ‌उत्तम घोसरे उपस्थित होते. यावेळी  डॉ. सूर यांनी उपस्थित विद्यार्थ्यासोबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.उमाटे यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री  यांच्या  कार्याचा आदर्श समोर ठेवून जीवनात वाटचाल करावी असा मौलिक संदेश दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जांभूळकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमोल ठाकरे तर आभारप्रदर्शन डॉ. उत्तम घोसरे यांनी केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments