बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल

बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल बातमी:30/4/2026 वरोरा : तालुक्यातील बांद्रा येथे अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १,०८० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल रोजी पोलिस पथक पेट्रोलिंगदरम्यान असताना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, बांद्रा येथील सुरज उमेश दोहतरे हा आपल्या घरी अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करीत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह संबंधित ठिकाणी धाड टाकली. कारवाईदरम्यान सुरज दोहतरे घरी नसल्याने त्याची पत्नी वनिता सुरज दोहतरे (वय २७) हिची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी पंचासमक्ष घरझडती घेतली असता स्वयंपाकघरातील भांड्याखाली कापडी पिशवीत ९० एम.एल.च्या ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या २७ बाटल्या देशी दारू आढळून आल्या. सदर दारूबाबत कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. नमुना म्हणून एका बाटलीला सील करून रासायनिक विश्लेषणासा...

केंद्रीय योजना सर्व स्तरावर राबवाव्यात**केंद्रीय मंत्र्यासोबत संवाद साधताना केली मागणी*

*केंद्रीय योजना सर्व स्तरावर राबवाव्यात*

*केंद्रीय मंत्र्यासोबत संवाद साधताना केली मागणी*

वरोडा : श्याम ठेंगडी 

           केंद्राच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत शहरी, ग्रामीण व जिल्हास्तरीय असा भेदभाव न करता या योजना सर्वसामान्यांसाठी सर्वच स्तरांवर राबविल्या जाव्यात मात्र प्रत्येक जिल्ह्यात या योजना राबवताना पक्षातील एखाद्या ज्येष्ठ तज्ञ नागरिकाची या योजनात नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी येथील राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या व सावित्रीबाई फुले महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णरेखाताई पाटील यांनी केंद्रीय पेट्रोलियम आवास व शहरी विकास मंत्री  हरदिपसिंग  पुरी यांचेकडे केली.
         चंद्रपूर येथील एनडी हॉटेल येथे आयोजित  जनसंघाच्या काळातील जेष्ठ कार्यकर्त्यांशी मंत्री महोदय संवाद साधत होते.त्यावेळी सुवर्णरेखाताई पाटील यांनी ही मागणी केली.
      केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी खर्चिक आजारासाठी आयुष्यमान भारत योजनेच्या धर्तीवर एखादी आरोग्य सेवा योजना आखावी. मात्र ही योजना सर्व स्तरावर ,सर्व प्रवर्गासाठी असावी अशी मागणी त्यांनी केली . 
     तसेच जनसंघाच्या ज्या कार्यकर्त्यांच्या पुण्याईवर भाजप आज जगात सर्वात मोठी सदस्य संख्या असलेला पक्ष बनला व एक मजबूत राजकीय शक्ती म्हणून उदयास आलेला आहे. त्या जनसंघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे पक्षाने दुर्लक्ष न करता त्यांना पक्षात मानाचे स्थान द्यावे अशीही मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.
         जे मंदिर किंवा इतर धर्मीय प्रार्थना स्थळातील प्रशासन तेथील पुजाऱ्यांच्या पुनर्जीवनाची सोय करू शकत नाही.  तेथील पुजाऱ्यांसाठी केंद्र शासनाने एखादी लाभदायी योजना आखावी अशी मागणी ही त्यांनी यावेळी बोलताना केली

Comments