विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

निळकंठराव शिंदे महाविद्यालयातर्फे हर घर तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन

निळकंठराव शिंदे महाविद्यालयातर्फे हर घर तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन
.......................................

भद्रावती:- स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा या अभीयानाअर्तगत जागृतीपर  दिनांक 12 ऑगस्ट 2022 ला प्रभात फेरी काढण्यात आली
प्रभात फेरीला संबोधित करीत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी सांगितले की देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकारकांनी दिलेला लढा व बलिदान तसेच देशांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये युवकांचे योगदान व त्यांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या या विषयाचे विस्तृत प्रमाणात मार्गदर्शन केले
महाराष्ट्र पोलीस शाखा वरोरा च्या वतीने भद्रावती मध्ये आगमन केलेल्या बाईक रॅलीचे महाविद्यालयातर्फे स्वागत व अभिवादन करण्यात आले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी महाविद्यालयापासून ते नाग मंदिर पर्यंत  हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत व दिनांक 13 ,14 व 15 ऑगस्ट रोजी सर्वांनी हर घर तिरंगा या जनजागृती अभियानांतर्गत सर्वांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा यासाठी लोकांमध्ये जागृती करण्यात आली
या प्रभात फेरीमध्ये महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या  संखेने उपस्थित होते

Comments