कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हातमाणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हात माणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ बातमी: चंद्रपूर : सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर तर्फे कॅन्सरशी झुंज देणाऱ्या १० वर्षीय कुमारी रोही सिंह हिला मदतीचा हात देण्यात आला आहे. ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत ही मदत करण्यात आली असून, तिच्या उपचारांसाठी महत्त्वाचे सहकार्य मिळाले आहे. मुळचे उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील नागेंद्र सिंह हे सध्या नागपूर येथे उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहेत. त्यांची अल्पवयीन मुलगी रोही सिंह हिला हाडांचा कॅन्सर (Bone Cancer) झाला असून, या गंभीर आजारामुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अशा कठीण परिस्थितीत ट्रस्टने पुढाकार घेत तिच्या उपचारांसाठी आर्थिक तसेच नैतिक आधार दिला आहे. या उपक्रमातून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर एका निरागस मुलीला नव्याने जगण्याची आशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रोही ही या आजारावर मात करून पुन्हा आनंदाने जीवन...

निळकंठराव शिंदे महाविद्यालयातर्फे हर घर तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन

निळकंठराव शिंदे महाविद्यालयातर्फे हर घर तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन
.......................................

भद्रावती:- स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा या अभीयानाअर्तगत जागृतीपर  दिनांक 12 ऑगस्ट 2022 ला प्रभात फेरी काढण्यात आली
प्रभात फेरीला संबोधित करीत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी सांगितले की देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकारकांनी दिलेला लढा व बलिदान तसेच देशांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये युवकांचे योगदान व त्यांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या या विषयाचे विस्तृत प्रमाणात मार्गदर्शन केले
महाराष्ट्र पोलीस शाखा वरोरा च्या वतीने भद्रावती मध्ये आगमन केलेल्या बाईक रॅलीचे महाविद्यालयातर्फे स्वागत व अभिवादन करण्यात आले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी महाविद्यालयापासून ते नाग मंदिर पर्यंत  हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत व दिनांक 13 ,14 व 15 ऑगस्ट रोजी सर्वांनी हर घर तिरंगा या जनजागृती अभियानांतर्गत सर्वांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा यासाठी लोकांमध्ये जागृती करण्यात आली
या प्रभात फेरीमध्ये महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या  संखेने उपस्थित होते

Comments