भद्रावतीत ग्रेटा एनर्जीच्या इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन; मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री रेड्डी यांच्या हस्ते संपन्न

भद्रावतीत ग्रेटा एनर्जीच्या इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन; मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री रेड्डी यांच्या हस्ते संपन्न भद्रावती, चेतन लूतडे  ता. १४ मार्च : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे ग्रेटा एनर्जीच्या इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय कोळसा व खाण मंत्री किशनजी रेड्डी साहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. हा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन स्टील निर्मितीला चालना मिळणार असून, उद्योग, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि स्थानिक विकास यांचा समतोल साधण्यात हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादय यावेळी करण्यात आले. याप्रसंगी मंत्री डॉ. अशोकजी उईके, राज्यमंत्री अॅड. आशिषजी जयस्वाल, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराजभैया अहीर, खासदार प्रतिभाताई धनोरकर, आमदार करणभाऊ देवतळे, आमदार किशोरजी जोरगेवार, आमदार देवराव...

पावसामुळे भद्रावती शहरातील मुख्य रस्त्याची दुर्गती.

पावसामुळे भद्रावती शहरातील मुख्य रस्त्याची दुर्गती.
भद्रावती
रवि बघेल

शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भद्रावती शहरातील मुख्य रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. भद्रावती शहरात एकच मुख्य रस्ता असल्याने संपूर्ण शहराची वाहतूक याच मार्गावरून होते. शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. भद्रावती शहरातील मुख्य रस्त्याचे पालिकेकडून रुंदीकरण करण्यात आले असून मध्यभागी पथदिवे बसविण्यात आले आहेत. शहरातील नाग मंदिर ते रेल्वे स्थानक या रस्त्याची अवस्था एवढी वाईट झाली आहे की, तेथून गाडी चालवताना कधी अपघात होतो याचा नियमच नाही.गिट्टी बाहेर आली आहे. आणि मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. 

काही ठिकाणी तर असे मोठे खड्डे पडले आहेत की त्यात पावसाचे पाणी तुंबून राहते.त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची अवस्था कशी आहे, हे समजत नाही आणि अनेकवेळा वाहन चालवताना पडून अपघातही झाले आहेत. नगर परिषदेने याकडे लक्ष देऊन भद्रावती शहरातील मुख्य रस्त्याची अवस्था सुधारावी. भद्रावती शहरातील जनतेची मागणी आहे की, शहरात एकच मुख्य रस्ता असल्याने लहान-मोठ्या वाहनांना या मार्गावरून ये-जा करावी लागते. आणि अशा स्थितीत या रस्त्याची अवस्था बिकट असल्याने लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेकडून रस्त्याचे डांबरीकरण का झाले नाही, ते आता पावसानंतर अशक्य असल्याचे दिसून येत आहे. या पावसाळ्यात काही वेळा रस्त्यावरील पथदिवेही बंद पडत असल्याने अपघात होण्याची भीती आहे. नगरपालिकेने शहराच्या या समस्येकडे लक्ष देऊन लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी भद्रावती शहरातील नागरिकांनी केली आहे.

Comments