निलजई–आमडी मार्गाचा रस्ता चार दिवसांत उखडला; निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा

निलजई–आमडी मार्गाचा रस्ता चार दिवसांत उखडला; निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा बातमी: वरोरा : निलजई, आमडी आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या निकृष्ट रस्त्याच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेले रस्ते नूतनीकरण अवघ्या चार दिवसांत उखडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकार तर्फे ठेकेदारा मार्फत रोड बांधण्याचे काम सुरू आहे. बांधकाम करण्यात येत असलेल्या या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. डांबराऐवजी वेस्टेज ऑईलचा वापर करून रस्ता तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत नागरिकांनी या प्रकाराला “बनावट विकास” असे संबोधले आहे. रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा आहे की, तो हातानेही उखडला जात असल्याचे ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. दरम्यान, या रस्त्याची दुर्दशा सोशल मीडियावर व्हायरल होऊनही संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कंत्राटदार आणि प्रशासनामध्ये साटेलोटे असल्याची शंका व्यक्त करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे...

शासनाची वाढीव चना खरेदी तिन दिवसातच बंद

शासनाची वाढीव चना खरेदी तिन दिवसातच बंद

वरोरा
चेतन लूतडे

शासनाची वाढीव चना खरेदी साठी 18 जून शेवटची तारीख  दिली होतो. जिल्ह्यातील 50 टक्के शेतकऱ्यांचा चना खरेदी बाकी असतानाच शासनाचे उद्दिष्ट पुर्ती पूर्ण झाल्यामुळे इंटरनेट वरील वेबसाईट बंद झाल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे जिल्ह्यातील बरेच शेतकरी आल्या पावलाने घरी वापस जात आहे. जिल्ह्यातील नेतृत्व शेतकऱ्यांसाठी कमी पडत असुन पावसाळ्यापूर्वीच चण्याची खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांचा चना घरीच सडण्याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे.
त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

Comments