गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त

गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त वरोरा, दि. २० एप्रिल २०२६: शहरातील गांधी चौक परिसरात पानठेल्याच्या आडून सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका संशयित जुगारीला ताब्यात घेत त्याच्याकडून सट्टापट्टीचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० एप्रिल रोजी पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे (बं.नं. २५७१) व त्यांच्या पथकातील अंमलदार मनोज ठाकरे व विशाल राजुरकर हे खाजगी वाहनाने शहरात अवैध जुगार प्रतिबंधासाठी गस्त घालत होते. यादरम्यान पोलिसांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, मौजा गांधी चौक येथील पानठेल्यासमोर शेख अरबाज नावाचा एक इसम लोकांकडून पैसे घेऊन टाईम बाजार सट्टापट्टी आकड्याचा जुगार खेळवत आहे. माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी दोन स्वतंत्र साक्षीदारांना पंच म्हणून बोलावले. पंचांसह पोलीस पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली असता, तेथे ...

भद्रावती रेल्वेस्थानकावर सुपरफास्ट गाड्यांचा थांबा सुरू करावा.भद्रावती रेल्वे स्थानकावर नागरिकांचे हाल

भद्रावती रेल्वेस्थानकावर सुपरफास्ट गाड्यांचा थांबा सुरू करावा.

भद्रावती रेल्वे स्थानकावर नागरिकांचे हाल

भद्रावती15/5/22
रवी बघेल


चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे ऐतिहासिक शहर असून या स्थानकावरून नागपूर व मुंबईला जाण्यासाठी एकही रेल्वे थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी जैन समाजाचे भव्य मंदिर , पुरातन गणपती मंदिर व नाग मंदिर तसेच बौद्ध लेणीसाठी प्रसिद्ध आहे. भद्रावती हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी मोठे उद्योग, डब्ल्यूसीएल, व ऑर्डनन्स फॅक्टरी असल्याने भारतातील बरेच प्रवासी या ठिकाणी येत असतात.

या स्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, पार्किंग, लाईट आदी मूलभूत सुविधा नाहीत.
भद्रावतीमध्ये कोरोनापूर्वी नागपूरमार्गे दिल्लीला जाण्यासाठी दक्षिण एक्सप्रेसचा थांबा होता. पण कोरोनामध्ये थांबा बंद झाला. कोरोना संपल्यानंतरही दक्षिण एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत करण्याची मागणी जनतेकडून होत आहे . 
डब्ल्यूसीएल आणि ओएफसीमध्ये बिहारी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने या लोकांना परराज्यात जाण्यासाठी खूप त्रास होतो, त्यामुळे पाटणा एक्स्, UP, DN ट्रेन थांबवण्याची मागणी होत आहे. 

भद्रावती येथील प्रवासी चंद्रपूरला उतरून
भद्रावतीला  बस रस्त्याने यावे लागते. त्यामुळे राजस्थान, गुजरात, दिल्ली मधून मोठ्या प्रमाणात येणारे भावीक जैन बांधवची गैरसोय होत आहे.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाने भद्रावती शहरातील रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा थांबा सुरु करावा अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे.
या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन यासंदर्भात पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे मत भद्रावती करांनी व्यक्त केले.

Comments