बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल

बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल बातमी:30/4/2026 वरोरा : तालुक्यातील बांद्रा येथे अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १,०८० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल रोजी पोलिस पथक पेट्रोलिंगदरम्यान असताना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, बांद्रा येथील सुरज उमेश दोहतरे हा आपल्या घरी अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करीत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह संबंधित ठिकाणी धाड टाकली. कारवाईदरम्यान सुरज दोहतरे घरी नसल्याने त्याची पत्नी वनिता सुरज दोहतरे (वय २७) हिची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी पंचासमक्ष घरझडती घेतली असता स्वयंपाकघरातील भांड्याखाली कापडी पिशवीत ९० एम.एल.च्या ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या २७ बाटल्या देशी दारू आढळून आल्या. सदर दारूबाबत कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. नमुना म्हणून एका बाटलीला सील करून रासायनिक विश्लेषणासा...

महाराष्ट्र दिनी ग्रामीण भागातील बस सेवा सुरळीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जनतेने मानले आभार

महाराष्ट्र दिनी ग्रामीण भागातील बस सेवा सुरळीत
निवेदनाचा पाठपुरावा करून   ग्रामीण भागासाठी बस सेवा सुरू केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे ग्रामीण भागातील जनतेने मानले आभार


चेतन लूतडे
1/5/22
महाराष्ट्र सरकारचा बस कर्मचाऱ्यांचा संप संपल्यानंतर शहरी भागातील बस सेवा सुरू करण्यात आली. मात्र ग्रामीण क्षेत्रातील लालपरी अजूनही बंद पडली आहे. याचा फटका सर्वसाधारण ग्रामीण जनतेला बसत असून उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे ग्रामीण भागातील जनतेला पायपीट करावी लागत आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पक्षाचे भद्रावती तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणकर यांनी वरोरा बस आगाराला निवेदन सादर केले होते ‌.

यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर तर राष्ट्रवादी संघटनेच्या नेत्यांनी ग्रामीण भागातील वरोरा ते सावरी व वरोरा ते मूधोली ही बस सेवा तात्काळ सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला याचा फायदा मिळणार आहे. बऱ्याच भागातील बस सेवा विस्कळीत झाले असून येणाऱ्या दिवसात ही सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन आगार प्रमुखांनी यांनी दिले.
यावेळी बस सेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास नेरकर व सुधाकर रोहणकर यांनी अथक प्रयत्न केले. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

Comments