प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

समाजातील शेवटच्या घटकाला दर्जेदार आरोग्यसेवा देणे आवश्यक

*समाजातील शेवटच्या घटकाला दर्जेदार आरोग्यसेवा देणे आवश्यक*

*खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते तालुका आरोग्य मेळाव्याचे उदघाटन*  
 
चंद्रपूर : सर्वसामान्य, गोरगरीब, गरजू रुग्णापर्यंत आरोग्य व्यवस्थेने पोहचून त्यांना सेवेचा लाभ देणे आवश्यक आहे. गरिबातल्या गरिबाला दर्जेदार आरोग्य सुविधा देणे यंत्रणेचे कर्तव्य असून त्यांनी जबाबदारी चोखपणे पार पडली पाहिजे असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

आजादी का अमृतमहोत्सव साजरा करण्याचा भाग म्हणून वरोरा येथील ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर, तहसीलदार रोशन मकवाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद्र  कन्नाके, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय वरोरा डॉ. अंकुश राठोड, तालुका आरोग्य अधिकारी वरोरा डॉ. बाळू मुंजुनकर, पोलीस उपनिरीक्षक मडावी, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा वानखेडे, सभापती राजू चिकटे, सुभाष दांदडे रोटरी क्लब अध्यक्ष वघले यांची उपस्थिती होती.  

जिल्हा रुग्णालयासारख्या सुविधा असलेल्या ग्रामीण रुग्णालयात मेळाव्यानिमित्त विविध आजारांवर तज्ञ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याकडे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे निदान व त्यावरील पुढील उपचार रुग्णांना मेळाव्यात होत आहे. स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्रतज्ञ, मधुमेहतज्ञ, उच्च रक्तदाब, दुर्धर आजार, संसर्गतज्ञ, असंसर्गतज्ञ आजारांवर निदान व उपचार पद्धतीचा लाभ यावेळी मेळाव्यानिमित्य शेकडो नागरिकांनी घेतला आहे.     

त्यासोबतच विविध आजार, आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करणे, पात्र नागरिकांना जागरूकता निर्माण करणे, पात्र नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड देणे, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांची माहिती व उपाययोजना इत्यादी कार्यक्रम या मेळाव्याच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. 

 . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .  . . . .  . . . . . . . . . . . . 

*निरोगी आयुष्यासाठी आरोग्याची तपासणी गरजेचीच : आमदार प्रतिभाताई धानोरकर*

चंद्रपूर : निरोगी आयुष्यासाठी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. त्याकरिता आरोग्य मेळावा हा चांगला उपक्रम आहे. आरोग्य मेळाव्याचा माध्यमातून जनतेने आपल्या रोगाचे निदान करून उपचार करून घ्यावा असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.

Comments