बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल

बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल बातमी:30/4/2026 वरोरा : तालुक्यातील बांद्रा येथे अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १,०८० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल रोजी पोलिस पथक पेट्रोलिंगदरम्यान असताना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, बांद्रा येथील सुरज उमेश दोहतरे हा आपल्या घरी अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करीत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह संबंधित ठिकाणी धाड टाकली. कारवाईदरम्यान सुरज दोहतरे घरी नसल्याने त्याची पत्नी वनिता सुरज दोहतरे (वय २७) हिची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी पंचासमक्ष घरझडती घेतली असता स्वयंपाकघरातील भांड्याखाली कापडी पिशवीत ९० एम.एल.च्या ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या २७ बाटल्या देशी दारू आढळून आल्या. सदर दारूबाबत कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. नमुना म्हणून एका बाटलीला सील करून रासायनिक विश्लेषणासा...

मंत्री तनपुरे यांचा चंद्रपूर दौरा येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी तर्फे सुधाकर रोहनकर यांना जबाबदारी देणार.

मंत्री तनपुरे यांचा चंद्रपूर दौरा

येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी तर्फे सुधाकर रोहनकर यांना जबाबदारी देणार.
वरोरा 20/2/22
चेतन लूतडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व संपर्कप्रमुख प्राजक्त प्रसाद तनपुरे यांची भद्रावती तालुक्यातील भटाळी या गावाला भेट दिली.सध्या त्यांच्याकडे महाराष्ट्रातील नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या विभागांचे विद्यमान राज्य मंत्रीपद असून चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भटाळी गावात भेट दिली.
मंत्र्यांचे स्वागत गोंडी पथनृत्याच्या गजरात  जिल्हा परिषद शाळा भटाळी येथे करण्यात आले. यावेळी गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व गाडगेबाबा स्वच्छता अभियाना अंतर्गत भटाळी गावापासून स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून त्याची सुरुवात मंत्री तनपुरे यांनी केली. मंत्र्यांनी स्वतः गावाचा फेरफटका मारत सरपंच यांनी केलेल्या कामाची स्तुती केली. 

यावेळी सुधाकर रोहणकर सरपंच यांनी दहा आरो फिल्टरची मागणी केली असून गावाचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी केली. खनिज निधी अंतर्गत भटाळी गावाला दुय्यम स्थान दिले असून राष्ट्रवादीचे गाव असल्याने कधीच निधी उपलब्ध झालेला नाही. अशी खंत व्यक्त केली.

मंत्र्यांनी सुद्धा कार्यकर्त्याच्या कामाची दखल घेत येणाऱ्या कालावधीत हे आश्वासन पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले. मात्र निधी अपुरा पडू नये यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुधाकर रोहणकर यांना मोठी जबाबदारी देण्याचे त्यांनी यावेळी नमूद करताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी काँग्रेस मधून आलेल्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्र्यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई ऊईके,भटाळी सरपंच सुधाकर रोहणकर, विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, मुन्नाज शेख, सह  गावकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments