बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल

बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल बातमी:30/4/2026 वरोरा : तालुक्यातील बांद्रा येथे अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १,०८० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल रोजी पोलिस पथक पेट्रोलिंगदरम्यान असताना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, बांद्रा येथील सुरज उमेश दोहतरे हा आपल्या घरी अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करीत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह संबंधित ठिकाणी धाड टाकली. कारवाईदरम्यान सुरज दोहतरे घरी नसल्याने त्याची पत्नी वनिता सुरज दोहतरे (वय २७) हिची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी पंचासमक्ष घरझडती घेतली असता स्वयंपाकघरातील भांड्याखाली कापडी पिशवीत ९० एम.एल.च्या ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या २७ बाटल्या देशी दारू आढळून आल्या. सदर दारूबाबत कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. नमुना म्हणून एका बाटलीला सील करून रासायनिक विश्लेषणासा...

वामन चटप यांची विदर्भ राज्यासाठी 'स्वतंत्र विदर्भ राज्य ' आंदोलनाची हाक..वरोरा येथे चटप यांची भेट.

माजी आमदार वामन चटप यांची विदर्भ राज्यासाठी 'स्वतंत्र विदर्भ राज्य ' आंदोलनासाठी युवकांना हाक..

वरोरा येथे चटप यांची धावती भेट.

वरोरा/चेतन/१५/३/२६: विदर्भ राज्य निर्मितीसाठी ‘स्वतंत्र विदर्भ राज्य ' अंतर्गत मोठे आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, भाजपने २०१४ मध्ये विदर्भात मते मागूनही शिवसेनेच्या विरोधामुळे राज्य देण्याचे आश्वासन पाळले नाही. यापूर्वी काँग्रेसनेही विविध समित्यांच्या शिफारशी लागू न करता जनतेची फसवणूक केल्याचा आरोप चटप यांनी केला आहे.

गेल्या २० वर्षात विदर्भातील ४७ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राज्यातील २ लाख ४७ हजार नोकऱ्यांचा अनुशेष लक्षात घेऊन हे आंदोलन बेरोजगारी व कुपोषण दूर करण्यासाठी आवश्यक असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी स्वतंत्र विदर्भ विषयावर वामनराव चटप यांच्याशी चर्चा करण्यात आली. युवकांनी हे आंदोलन हाती घ्यावे असे मत चटप यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र दिवाळखोरीत असून, येथे तरुणांना रोजगार मिळणार नसल्याने लवकरात लवकर विदर्भ राज्य निर्माण व्हावे, अशी मागणी करत आंदोलकांनी खासदारांना व आमदारांनी राजीनामे देऊन जनसंग्रामात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी आनंदवन चौक येथील कुकूले यांच्या प्रतिष्ठानात  चर्चा करण्यात आली. यावेळी स्वतंत्र विदर्भाचे साहित्य युवकांना वाटण्यात आले. युवकांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी व्हावे असे मत चटप यांनी व्यक्त केले. 

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, डॉक्टर सागर वजे, समीर बारई, पंकज नौकरकार, अनिल पाटील, बाबा आगलावे, समीर हक्के  उपस्थित होते.

Comments