प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

**कोळसा वाहतुकीच्या स्पर्धेत गँगवार : एकोणा खाणीत दोघे गंभीर जखमी; सात जणांवर गुन्हा*

**कोळसा वाहतुकीच्या स्पर्धेत गँगवार : एकोणा खाणीत दोघे गंभीर जखमी; सात जणांवर गुन्हा**  

वरोरा : प्रतिनिधी

 चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणा कोळसा खाणीत कोळसा वाहतुकीच्या स्पर्धेतून गँगवार झाल्याची धास्तीकारक घटना समोर आली आहे. या मारहाणीत दोघे व्यावसायिक गंभीर जखमी झाले असून, वरोरा पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ जून रोजी दुपारी साडेचार वाजता एकोणा कोळसा खाणीच्या एमएसएफ चेकपोस्टजवळ घडली.  

घटनेचा क्रम
भद्रावती तालुक्यातील माजरी-एता नगरचे रूपचंद राजबहादूर यादव (३२) हे रोहीत कॉर्पोरेशन आणि रोहन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वतीने कोळसा वाहतूक व्यवसाय करतात. ४ जून रोजी ते त्यांच्या सहकारी राहुल ठाकूर यांच्यासोबत **एमएच २९ एडी ६९०१** या कारने खाणीच्या वाहतूक व्यवस्थेची निरीक्षणे करून परत जात होते. तेवढ्यात एमएसएफ चेकपोस्टजवळ एका 
पांढऱ्या रंगाच्या कार (एमएच २९ एआर ३८१८) मधून  प्रतिस्पर्धी कोळसा वाहतुकीतील काहीजण त्यांनी राहुल ठाकूरवर शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. या हल्ल्यात रूपचंद यादव आणि राहुल ठाकूर गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी बंदूक दाखवून जीवे मारण्याचीही धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला. यानंतर कारने ठोस मारून आपला जीव वाचवित बाजूने कार काढली तेथून वरोरा पोलीस स्टेशन गाठले.  पोलिसांना आपबिती फिर्यादीने सांगितली . यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेडिकल रिपोर्ट अजून पर्यंत मिळाली नसून यादव यांना चेहऱ्यावर चार पाच टाके लागलेले आहेत. त्यामुळे या प्रकरनाची दखल घेत  पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी फिर्यादीने केली आहे.
*स्पर्धेमुळे वाढते हिंसाचार* 
चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा व्यवसायासाठी झालेल्या स्पर्धेत अनेक वेळा गुंडगिरी, मारामाऱ्या आणि खूनांपर्यंतचे प्रकार घडत आहेत. व्यावसायिक एकमेकांवर वचपा काढण्यासाठी गुंडांचा वापरत असल्याचे आरोप आहेत. पोलिसांनी या प्रकरणी सात जणांवर गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली असून, आरोपींच्या पकडीसाठी तपास चालविण्यात आला आहे.  

कोळसा वाहतुकीच्या अवैध व्यवसायामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांकडून येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे.  

— **संवाददाता**, वरोरा (चंद्रपूर)
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी से भेट कर अपने कनिष्ठ सुपुत्र ची. श्यामल के शुभ विवाह स्वागत समारोह का आमंत्रण दिया l



Comments