वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

श्री संत गजानन महाराजांच्या अमृतकण प्रवचनात भक्तांच्या जीवनातील भाग्याचे लक्षण म्हणजे महाराजांची कृपा — प्रा. सुरेश शेवडे

*श्री संत गजानन महाराजांच्या अमृतकण प्रवचनात भक्तांच्या जीवनातील भाग्याचे लक्षण म्हणजे महाराजांची कृपा — प्रा. सुरेश शेवडे*  

*वरोरा* : 
श्री संत गजानन महाराजांचे जीवन अलौकिक चरित्र आणि आध्यात्मिक शिकवणींनी भरलेले आहे. त्यांच्या जीवनातील प्रसंग आणि कृपा भक्तांच्या भाग्याचे लक्षण आहे, असे प्रतिपादन *गजानन बावन्नी*चे रचयिते प्रा. सुरेश शेवडे (आबा) यांनी श्री संत गजानन महाराज भक्त परिवाराच्या *अमृतकण* प्रवचन कार्यक्रमात केले.  

९० वर्षीय प्रा. शेवडे यांनी महाराजांच्या चरित्रातील अनेक अनुभव रसाळ शैलीत सांगितले. *"महाराज गुणातीत आहेत. त्यांना सदाचारी भक्त प्रिय आहेत. ज्यांनी मनापासून श्रद्धा केली, त्यांच्या जीवनात महाराज स्वतः प्रकट झाले आणि कृपा केली,"* असे ते म्हणाले.  

हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व आणि गजानन महाराजांचे तत्त्वज्ञान*
प्रा. शेवडे यांनी हिंदू धर्माच्या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकताना सांगितले, *"हिंदू धर्म ईश्वरप्रणीत असून तो जगातील श्रेष्ठ धर्म आहे. इतर धर्म मानवनिर्मित पंथ आहेत, म्हणूनच वेद-पुराणे जगभर पूज्य मानली जातात."*  

*पादुका परिक्रमा आणि भक्तांचा उत्साह**  
कार्यक्रमापूर्वी वरोरा नगरात पादुका परिक्रमा आयोजित करण्यात आली होती, जिथे रांगोळी आणि पुष्पवृष्टीने भक्तांनी स्वागत केले. यावेळी *बाळकृष्ण कुळसंगे (उल्हासनगर)* यांनी आपले अनुभव सांगितले तसेच *अमृतकण* या ग्रंथाचे विमोचनही करण्यात आले.  

कार्यक्रमाचे संचालन *उमेश लाभे* यांनी तर प्रास्ताविक *राजीव दोडके* यांनी केले. मुंबई, यवतमाळ, चंद्रपूरसह अनेक भागांतून आलेल्या भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.  

**भक्ती आणि सदाचाराचा संदेश देणारा हा प्रसंग भाविकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.**  


Comments