विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक – पालकमंत्री डॉ. वुईकेØ महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्नØ उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कारØ महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप

विकसीत महाराष्ट्र्रात चंद्रपुरचे योगदान आवश्यक  – पालकमंत्री डॉ. वुईके Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार Ø महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरकुल पट्टे वाटप चंद्रपूर, दि. 01 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत 'विकसीत भारताचे' उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा 'विकसीत महाराष्ट्र' घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाचा विकास, हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी काम करीत असून विकसीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली. पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, म...

श्री संत गजानन महाराजांच्या अमृतकण प्रवचनात भक्तांच्या जीवनातील भाग्याचे लक्षण म्हणजे महाराजांची कृपा — प्रा. सुरेश शेवडे

*श्री संत गजानन महाराजांच्या अमृतकण प्रवचनात भक्तांच्या जीवनातील भाग्याचे लक्षण म्हणजे महाराजांची कृपा — प्रा. सुरेश शेवडे*  

*वरोरा* : 
श्री संत गजानन महाराजांचे जीवन अलौकिक चरित्र आणि आध्यात्मिक शिकवणींनी भरलेले आहे. त्यांच्या जीवनातील प्रसंग आणि कृपा भक्तांच्या भाग्याचे लक्षण आहे, असे प्रतिपादन *गजानन बावन्नी*चे रचयिते प्रा. सुरेश शेवडे (आबा) यांनी श्री संत गजानन महाराज भक्त परिवाराच्या *अमृतकण* प्रवचन कार्यक्रमात केले.  

९० वर्षीय प्रा. शेवडे यांनी महाराजांच्या चरित्रातील अनेक अनुभव रसाळ शैलीत सांगितले. *"महाराज गुणातीत आहेत. त्यांना सदाचारी भक्त प्रिय आहेत. ज्यांनी मनापासून श्रद्धा केली, त्यांच्या जीवनात महाराज स्वतः प्रकट झाले आणि कृपा केली,"* असे ते म्हणाले.  

हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व आणि गजानन महाराजांचे तत्त्वज्ञान*
प्रा. शेवडे यांनी हिंदू धर्माच्या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकताना सांगितले, *"हिंदू धर्म ईश्वरप्रणीत असून तो जगातील श्रेष्ठ धर्म आहे. इतर धर्म मानवनिर्मित पंथ आहेत, म्हणूनच वेद-पुराणे जगभर पूज्य मानली जातात."*  

*पादुका परिक्रमा आणि भक्तांचा उत्साह**  
कार्यक्रमापूर्वी वरोरा नगरात पादुका परिक्रमा आयोजित करण्यात आली होती, जिथे रांगोळी आणि पुष्पवृष्टीने भक्तांनी स्वागत केले. यावेळी *बाळकृष्ण कुळसंगे (उल्हासनगर)* यांनी आपले अनुभव सांगितले तसेच *अमृतकण* या ग्रंथाचे विमोचनही करण्यात आले.  

कार्यक्रमाचे संचालन *उमेश लाभे* यांनी तर प्रास्ताविक *राजीव दोडके* यांनी केले. मुंबई, यवतमाळ, चंद्रपूरसह अनेक भागांतून आलेल्या भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.  

**भक्ती आणि सदाचाराचा संदेश देणारा हा प्रसंग भाविकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.**  


Comments