शेतातील विषारी पायझन खाल्ल्याने दहा दुधाळू म्हशी गंभीर आजारी; शेतकऱ्यांचे अश्रू अनावर

शेतातील विषारी पायझन खाल्ल्याने दहा दुधाळू म्हशी गंभीर आजारी; शेतकऱ्यांचे अश्रू अनावर वरोरा, दि. ४ मार्च: वरोरा तालुक्यातील दूध, दही आणि खव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आसाळा गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. होळीच्या सणानिमित्त गुराखी दारूच्या नशेत झोपून राहिल्याने चरायला नेलेल्या जनावरांचा मागे राहिला नाही. याचा फायदा घेत कपाशीच्या शेतात घुसलेल्या दहा दुधाळू म्हशींनी शेतात जंगली जनावरांसाठी टाकण्यात आलेले विषारी पायझन खाल्ल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. आसाळा गावातील गुराखी दररोजप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात जनावरे चारायला नेत होता. मात्र, होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर त्याने मद्यपान केले होते. चराईदरम्यान तो झाडाखाली झोपून राहिला. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या जनावरांचा मागे राखण करण्यासाठी राहिला नाही. ही जनावरे शेजारील एका कापूस लागवड केलेल्या शेतात घुसली होती. या शेतात रानटी डुक्कर, रानगवे यांसारख्या जंगली प्राण्यांपासून पिकाचे रक्षण व्हावे यासाठी शेतकऱ्याने विषारी पायझन (कीटकनाशक) टाकून ठेवले होते. म्हशी चारा खात असताना म्हशींनी हे विषारी पदार्थ खाल्...

*आणीबाणी विरोधातील संघर्ष लढ्याचे छायाचित्र प्रदर्शन**Ø जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्घाटन**Ø प्रशासकीय इमारत येथे 25 ते 28 जून पर्यंत नागरिकांसाठी खुले*

*आणीबाणी विरोधातील संघर्ष लढ्याचे छायाचित्र प्रदर्शन*

*जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्घाटन*

*प्रशासकीय इमारत येथे 25 ते 28 जून पर्यंत नागरिकांसाठी खुले*

चंद्रपूर, दि. 25 : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी  25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. या घटनेला आज 50 वर्षे पूर्ण होत आहे. त्याचे आौचित्य साधून केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनुसार आणीबाणी विरोधातील संघर्ष लढ्याचे नागरिकांना अवलोकन व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने चार दिवसांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सदर प्रदर्शन प्रशासकीय इमारतीमध्ये दि. 25 ते 28 जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार,  जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

*प्रदर्शनामध्ये समाविष्ट बाबी :* पुरातन काळापासून भारतात सुरू असलेली लोकशाही व्यवस्था, लोकशाही परंपरेनुसार यात असलेला लोकांचा सहभाग व दृष्टीकोण, लोकशाहीचे तत्व, भारतीय परंपरा आणि सामुहिक भागीदारीने चालविण्यात आलेले शासन, ग्रामीण आणि शहरी भागातील जमीन स्तरावरील लोकशाही व्यवस्था, स्वतंत्र भारत आणि लोकशाही प्रणाली, आणीबाणीपूर्व व पश्चात भारतीय समाजव्यवस्था, आणीबाणी लावल्यानंतर प्रसिध्द झालेले राजपत्र, प्रसारमाध्यमांवरील निर्बंध, सरकारच्या विरोधात जनआंदोलन, आणीबाणी संपल्यानंतर लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी उचलण्यात आलेली पाऊले, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा आणीबाणी विरोधातील संघर्ष लढा, आदींचा यात समावेश करण्यात आला आहे.

*आणीबाणीधारकांना प्रमाणपत्राचे वाटप :* आणीबाणीत तुरंगवास भोगलेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यात हेमंत वासुदेव डहाके, गिरीश वासुदेवराव अणे, अनिल मधुकर अंदनकर, सुधीर वसंतराव टिकेकर, नारायण कृष्णराव पिंपळापुरे, कृष्णा दत्तात्रय देशपांडे यांचा समावेश होता.

००००००

Comments