खरीप हंगामपुर्वी शेतकऱ्यांना विज कनेक्शन द्या : किशोर डुकरे यांची मागणीलोंबकळलेल्या वीज तारा दुरुस्त करा
लोंबकळलेल्या वीज तारा दुरुस्त करा
चंद्रपूर : खरीप हंगाम काही दिवसांवर आला असता हा शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे, ही माहिती तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते किशोर डुकरे यांना मिळतात त्यांनी संबंधित विभागातील वरिष्ठ अभियंता नवघरे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधित शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडून देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
वीज कनेक्शन कापण्याची पुढील कारवाई थांबवण्यात यावी अन्यथा पिढीत शेतकऱ्यांना घेऊन आमरण उपोषण केल्या जाईल असा इशारा पण त्यांनी दिला आहे. तसेच आज ५०- ६० वर्षात अगोदर गाव खेळामध्ये विज जोडणी केलेली आहे,
मात्र कधी त्या ठिकाणचे जोडणी केलेले पोल जंगलेले आहे, तर वीज जोडणी तारा लोंबकळलेल्या आहे. यामुळे गाव खेड्यात कधी अपघात होऊ शकतो याकडे संबंधित विभागाचे लक्ष द्यावे अशी मागणी सुध्दा त्यांनी यावेळी केली आहे. यामध्ये वरोरा तालुक्यातील ७२ शेतकरी असून या शेतकऱ्यांवर वीज वितरण कंपनीमुळे होणाऱ्या कारवाईमुळे मोठे संकट उभे राहणार आहे तरीपण या शेतकऱ्यासोबत सदैव उभा राहील. यासाठी आंदोलन करणार असल्याचे तालुक्याचे शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment