कुसुंबी व नोकारी येथे प्रत्यक्ष पाहणी करून होणार मोजणी योग्य मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या दालनात सकारात्मक बैठक,शेतकरी व माणिकगड कंपनीच्या अधिका-यांची उपस्थिती

कुसुंबी व नोकारी येथे प्रत्यक्ष पाहणी करून होणार मोजणी  योग्य मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या दालनात सकारात्मक बैठक शेतकरी व माणिकगड कंपनीच्या अधिका-यांची उपस्थिती चंद्रपूर, दि. 29 : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी (माणिकगड सिमेंट) क्षेत्रातील जमिनीच्या संदर्भात बांबेझरी, कुसुंबी आणि नोकारी येथील शेतक-यांनी मांडलेल्या विषयावर जिल्हा प्रशासन गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने तोडगा काढत आहे. या संदर्भात बुधवारी (दि. 29) जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली गावातील शेतकरी तसेच माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. विशेष म्हणजे कुसुंबी आणि नोकारी येथे प्रशासनाचे अधिकारी, शेतकरी आणि कंपनीच्या प्रतिनधींसमोर जमिनीची मोजणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पंत यांनी स्पष्ट केले. यावर उपस्थित शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, राजुराचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, उपजिल्हाधिकारी (जमीन) सचिन कुमावत, भुमी अभिलेख जिल्हा अधिक्षक प्रदीप जगताप, तहसीलदार ओमप्रकाश गोंड ( राजुरा), रुपाली ...

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड करणार 10वी च्या परीक्षांवर पुनःविचारखासदार धानोरकरांच्या पत्राची दखल

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड करणार 10वी च्या परीक्षांवर पुनःविचार
खासदार धानोरकरांच्या पत्राची दखल

वरोरा 


केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने अलिकडेच नविन शैक्षणिक धोरणाअंतर्गत 10वी च्या परिक्षा पद्धतील बदल करण्यासंदर्भात आराखडा तयार केला आहे. यामध्ये 10वी च्या परीक्षा दोन वेळा होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या मानसिक व शारिरीक त्रासाची दखल घेत खासदार धानोरकर यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाला पत्र पाठवून प्रचलित पद्धतीत बदल करु नये अशी मागणी पत्राद्वारे केली होती. या संदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने खासदारांच्या मागणी ची दखल घेऊन वरील निर्णणयावर पुनःविचार करणार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

नविन परिक्षा पद्धीत दोन वेळा होणाऱ्या परीक्षा या मार्च व मे महिन्यात होणार आहे. सदर कालावधीत विदर्भासह महाराष्ट्रात उन्हाची दाहकता अधिक असल्याने विद्यार्थ्यांना शारिरीक व मानसिक तासाला समोर जावे लागणार आहे. त्यासोबच, शाळांदेखील सदर परिक्षा पदृधीत अडचणी च्या ठरणार आहे. या कारणात्सव खासदार धानोरकर यांनी सदर परीक्षा पद्धतील विरोध करुन एकच परिक्षा सुरु ठेवण्याची मागणी केली होती. या संदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डा ने खासदार धानोरकर यांची शिफारस मान्य केली असून लवकरच बोर्ड यावर निर्णय घेणार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. असे झाल्यास अनेक विद्यार्थ्यांना याचा सोयीचे होणार आहे.

Comments